वार्ताहर / साळवण
कोरोना विषाणू महामारीच्या काळात शासनाने JEE,NEET परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थी पालक यांच्या सुरक्षतेला धोका निर्माण झाला आहे,त्यामुळे शासनाने कोरोनाच्या पाश्र्वभूमी विद्यार्थ्याच्या आरोग्याचा विचार करुन ही परिक्षा न घेता ती रद्द करावी,या मागणीसाठी कोल्हापूर यूवक काँग्रेसच्या वतीने गगनबावडा तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.
देशात कोरोना विषाणूने थैमान माजविले असताना शासनाने JEE,NEET परिक्षा घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे संपूर्ण देशभर कोरोना विषाणूपासून सुरक्षतेच्या कारणास्तव विद्यार्थी पालकामध्ये चिंता निर्माण झाली आहे,देशात कोरोनामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली असताना शासन ही परिक्षा घेऊन विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत आहे,शासनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करुन कोरोनाचे संकट कमी होईपर्यंत परिक्षा घेऊ नये अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.
कोल्हापूर यूवक काँग्रेसच्या वतीने JEE,NEET परिक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी देण्यात आलेले निवेदन नायब तहसिलदार संजय वळवी यांनी स्विकारले. यावेळी कोल्हापूर यूवक काँग्रेसचे उपाध्यक्ष व प्रवक्ता बयाजी शेळके,सुर्यकांत पडवळ,योगेश काटकर,राजेश पाटील,यश पाटील,नंदकुमार पाटील, गूरूनाथ पाटील आदी उपस्थित होते.