यंदाच्या दहावीच्या निकालात वाढ; कोल्हापूर विभागात यंदाही मुलींचीच बाजी
प्रतिनिधी / कोल्हापूर
पुणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आज दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. राज्याचा दहावीचा निकाल ९९.९५ टक्के तर कोल्हापूर विभागाचा ९९.९२ टक्के निकाल लागला आहे.
यंदा राज्यासह कोल्हापूर विभागाच्या निकालास वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांनी मोबाईल व इंटरनेट केंद्रावर ऑनलाईन निकाल पाहिला. दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर इंटरनेट केंद्रावर तोबा गर्दी दिसायची. पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी घरात बसूनच निकाल पाहण्याचा आनंद घेतला. यंदाही कोल्हापूर विभागात दहावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली.
दहावीचा निकाल लागला की दरवर्षीप्रमाणे गुणवंत विद्यार्थ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव व्हायचा, नातेवाईक गुणवंत विद्यार्थ्यांना हारतुरे व पेढे देऊन अभिनंदन करायचे त्याचबरोबर शाळेमध्येही सत्कार समारंभ केले जायचे. यंदा मात्र या सगळ्यांना विद्यार्थ्यांना मुकावे लागणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत मूल्यमापनानुसार दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये ७० टक्के गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. तर ३० विद्यार्थ्यांचा फायदा आहे.