कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापुरातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा पाचवा दिवस असून एसटी कर्मचारी आपल्या संपावर ठाम असल्याचे दिसून येत आहे. कर्मचाऱ्यांचे निलंबन करुन राज्य शासनाने कर्मचाऱ्यांना ईशारावजा कारवाई केल्याने आंदोलकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कोल्हापूर विभागातील १५ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करुन राज्य सरकारकडून संप मोडीत काढण्याचा डाव आहे मात्र कोणत्याही कारवाईला कर्मचारी भीक घालणार नाही, आम्ही आमच्या संपावर ठाम आहोत कारवाई कराल तर विभागीय कार्यालयाला घेराव घालू असा इशारा कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारला दिला आहे.