जिल्ह्याच्या कृषी, औद्योगिकसह स्थानिक उद्योग व्यवसाय वाढीला मिळणार गती
प्रतिनिधी / गोकुळ शिरगाव, कोल्हापूर
कोल्हापूर (उजळाईवाडी) विमानतळावरुन कार्गो वाहतूक सेवेसाठी (मालवाहतूक) भारतीय नागरी विमान सुरक्षा ब्युरोने (बीसीएएस) मान्यता दिली आहे. यामुळे जिह्याच्या कृषी, कृषीपूरक व्यवसायासह औद्योगिक आणि इतर स्थानिक उद्योग आणि व्यवसाय वाढीला गती मिळणार आहे. कार्गोसेवेमुळे आयात आणि निर्यात वेगाने होणार आहे. देशाच्या कानाकोपऱयात केवळ सहा तासात कोल्हापूर जिल्हय़ातील वस्तू, माल पोहचणार असल्याने वेळेचीही बचत होणार आहे. त्याचबरोबर नवनवीन बाजार पेठेत कोल्हापूरचा माल, वस्तू पाठविण्याची संधीही स्थानिक उद्योजक, व्यावसायिकांना मिळणार आहे. त्याचबरोबर कोल्हापूरची बाजार पेठ विस्तारण्यासही मदत होणार आहे.
कोल्हापूर विमानतळावरून सध्या प्रवासी विमानसेवा सुरू आहे. मुंबई, बेंगळूर, हैदराबाद, तिरूपती आदी ठिकाणी पेंद्र सरकारच्या उडाण योजनेतर्गंत आंतरराज्य विमानसेवा सुरू आहे. गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूर विमानतळावरून कार्गो वाहतूक सेवा सुरू करण्याची मागणी सुरू होती. शिरोली एमआयडीसी, गोकुळ शिरगाव एमआयडीसी, कागल पंचतारांकित एमआयडीसीसह जिल्हय़ातील इतर एमआयडीसीतील उद्योजकांकडून कार्गो वाहतूक सेवा सुरू करण्याचा आग्रह होता. त्याचबरोबर कृषी उत्पादने आणि कृषीपूरक उत्पादने, कृषी अवजारे बनविणाऱया उद्योगांकडूनही कार्गो वाहतूक सेवा सुरू करण्याविषयी सातत्याने मागणी केली जात होती.
जिल्ह्याच्या विकासाला चालना; पालकमंत्री सतेज पाटील
कार्गो सेवेला मान्यता मिळण्यासाठी पाठपुरावा केलेले पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, कृषी उत्पादन, औद्योगिक, दुग्धोपादन आणि वैद्यकीय क्षेत्रातून या कार्गो सेवेची मागणी होत होती. या सेवेला मंजुरी मिळाल्यामुळे जिह्यातील उद्योजक आणि शेतकऱयांना लाभ मिळेल. स्थानिक उद्योगांना, शेती व शेतीपूरक उत्पादनाला उत्तेजन मिळेल. कोल्हापूरसह परिसरातील शेतमाल, उद्योगांनाही या सेवेचा मोठा फायदा होईल. स्थानिक उत्पादन अन्य राज्यांबरोबरच आंतरराष्ट्रीय विमानतळाहून परदेशी बाजारपेठेत जाण्यास मदत होईल. आयात-निर्यात वाढल्याने जिह्याच्या विकासाला गती मिळेल.
स्वर्गीय आमदार चंद्रकांत जाधवांचे स्वप्न
कोल्हापूर उत्तरचे दिवगंत आमदार चंद्रकांत जाधव 2011-2012 या काळात गोशिमाचे अध्यक्ष होते. उद्योजक असणाऱया जाधव यांनी त्याकाळी कोल्हापूर विमानतळावरून कार्गो सेवा सुरू करण्याचा आग्रह तत्कालिन लोकप्रतिनिधींकडे केला होता. आमदार झाल्यावरही जाधव यांनी पाठपुरावा केला होता. आज कार्गो सेवेला मंजुरी मिळाली पण ते पाहण्यास आमदार जाधव या जगात नाही. त्यांचे स्वप्न मात्र पूर्ण झाले.
कार्गो सेवा लाभ या उद्योगांना
जिल्हय़ातील साखर उद्योग, गूळ उद्योग, दूग्धोव्यवसाय, फूल शेती, शेतमाल, शेतीपूरक माल, शेती अवजारे, औद्योगिक व्यवसाय, फौंड्री व्यवसाय, कापड उद्योग (इचलकरंजी), चांदी उद्योग (हुपरी, कोल्हापूर शहर), वाहन उद्योग.
कार्गो सेवेमुळे विविध प्रकारच्या स्थानिक उद्योगांचे मुल्य वाढेल. त्याचबरोबर जिह्याच्या सामाजिक, आर्थिक स्वरुपावर कार्गो सेवा दीर्घकालीन सकारात्मक परिणाम निर्माण करेल. – सतेज पाटील, पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री
कार्गो सेवेमुळे स्थानिक उद्योगांना लाभ होणार आहे. देशविदेशातील नवनवीन उद्योग कोल्हापूरमध्ये येण्याचा मार्ग सुकर झाला झाला आहे. उद्योगवाढीमुळे उत्पादन आणि रोजगारही वाढेल. बऱयाच वर्षांची ही मागणी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे पूर्ण होते आहे. – स्वरूप कदम, उद्योजक, कमला प्लास्टिक, खजानीस गोशिमा