कोल्हापूर / प्रतिनिधी
मारामारी, खूनाचा प्रयत्न यासह विविध गंभीर गुन्हे दाखल असणाऱया सहा जणांना कोल्हापूर पोलीसांनी 2 वर्षासाठी जिह्यातून हद्दपार केले. यामध्ये जुना राजवाडा, राजारामपुरी तसेच शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांचा समावेश आहे. करवीर उपविभागीय दंडाधिकारी वैभव नावडकर यांच्याकडे हे प्रस्ताव मंजूरीसाठी पाठविण्यात आले होते. त्याला नुकतीच मंजूरी देण्यात आली आहे.
तानाजी धोंडीराम कोळापटे (रा. फुलेवाडी रिंग रोड, नृसिंह कॉलनी, गंगाई लॉन), बंडु प्रल्हाद लोंढे (रा. टिंबर मार्केट, सध्या रा. त्रिमुर्ती कॉलनी, कळंबा), अमित अंकुश बामणे (रा. बी वॉर्ड, सुभाषनगर), निलेश सुनिल कांबळे (रा. दौलतनगर), राजु शिवाजी जाधव (कळंबा ता. करवीर), करण किशोर दणाणे (रा. कनाननगर) अशी हद्दपार केलेल्यांची नावे आहेत. या सहा जणांना दोन वर्षासाठी जिह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
शहर पोलीस उपअधिक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी ही कारवाई केली.