भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांचे प्रतिपादन
शिवाजी विद्यापीठाचा ऑनलाइन दीक्षांत समारंभ उत्साहात
प्रतिनिधी / कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठ संशोधनांमध्ये देशात अव्वल आहे असे प्रतिपादन भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांनी केले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या ५७ व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी होते. डॉ. सहस्त्रबुद्धे म्हणाले, पदवी प्रमाणपत्र घेतल्यानंतर शिक्षण संपत नाही तर आयुष्यातील जबाबदारी वाढते. विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर वाहत न जाता शिक्षणात प्रगती केली पाहिजे.
अध्यक्षस्थानावरून बोलताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले, शिवाजी विद्यापीठाला शैक्षणिक संशोधन सामाजिक जबाबदारी अभ्यासक्रम त्याच्या जोरावर नॅकचे ए प्लस प्लस मानांकन मिळवले याचा मला अभिमान आहे. तरुणाने शैक्षणिक दृष्ट्या प्रगती केली तरच देश महान बनेल त्यासाठी विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर बनले पाहिजे. महापुरुषांच्या विचारांचे अनुकरण करून एकजूट राहिले पाहिजे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आत्मनिर्भरतेचे धडे दिले जाणार आहेत. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने तयार केलेला अभ्यासक्रम, संशोधन, सामाजिक जबाबदारी याच्या जोरावर नॅकचे ए प्लस प्लस मानांकन मिळवले आहे.
आज ७७ हजार ५४२ विद्यार्थी पदवी प्रमाणपत्र घेतात याचा मला आनंद आहे. मी पण शिवाजी विद्यापीठाचा माजी विद्यार्थी असून विद्यापीठ सीमाभागात काम करतो. त्याचबरोबर कोरोनाचा पहिला लाटेमध्ये विद्यार्थ्यांनी आरोग्य सेवक, आशा वर्कर्स यांना मदत केली आहे. विद्यापीठाचे उपक्रम पुढे नेण्यासाठी शासकीय पातळीवर जेवढे अनुदान देता येईल तेवढे मी अनुदान देईल तसेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त शेतकरी असल्याने इंजिनिअरिंग कॉलेज शासनाकडून मंजूर करून दिले आहे तरी डॉक्टर सहस्त्रबुद्धे यांनी या कॉलेजला मंजुरी द्यावी अशी अपेक्षा शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावेळी व्यक्त केली.