ऑनलाईन चर्चेत लॉकडाऊनबाबत संमिश्र प्रतिक्रिया
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिह्यात गेल्या पंधरा दिवसात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. अनेक ठिकाणी समूह संसर्गाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे परिस्थिती आवाक्याबाहेर जाण्यापूर्वीच जिह्यात लॉकडाऊन करावे, अशी मागणी काही लोकप्रतिनिधींनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत केली. तर 650 कोरोनाबाधितांसाठी जिह्यातील 40 लाख लोकांचे विलगीकरण करणार काय ? असा सवाल उपस्थित करत काही लोकप्रतिनिधींनी लॉकडाऊन करण्यास विरोध दर्शवला.
कोरोनाबाधितांची संख्या आणि कराव्या लागणाऱया उपाययोजना याबाबतचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी जिह्यातील लोकप्रतिनिधींशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. या ऑनलाईन बैठकीत लॉकडाऊन करावे की नको याबाबत दोन मतप्रवाह समोर आलेत. कोरोनाबाधितांची वाढती संख्या आणि उपलब्ध आरोग्य यंत्रणा पाहता लॉकडाऊन आवश्यक असल्याचे मत अनेक नेत्यांनी मांडले. तर लॉकडाऊन काही कोरोना रुग्णांसाठी जिह्यातील सर्व जनतेचे विलगीकरण करणार काय ? असा सवाल काही नेत्यांनी उपस्थित केला. यावेळी टेस्टचे प्रमाण वाढवॅन नियम कडक करावेत अशी मागणी करण्यात आली. लॉकडाऊनबाबत संमिश्र मते आल्यामुळे याबाबत विचार करून सायंकाळी निर्णय घेतला जाणार आहे.