इंजिनिअरिंग औद्योगिक संघटनांच्या मागण्यांबाबत ना. राजेंद्र पाटील- यड्रावकर सकारात्मक
प्रतिनिधी / इचलकरंजी
भविष्यामध्ये कोरोनाची तिसरी व चौथी लाट येणार असे सांगितले जात आहे. छोट्या उद्योगांचे अर्थचक्र चालू ठेवण्यासाठी उद्योगाच्या ठिकाणी राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्याची अट उद्योजक व कामगार दोघांनाच्याही गैरसोयीची आहे त्यामुळे ज्या कामगारांचे लसीकरण झाले आहे अशा कामगारांना कामाच्या ठिकाणी जाण्यास मज्जाव करू नये.
स्थानिक प्रशासनाकडून सेवा उत्पादने शेती निर्यात पूरक उत्पादने व निरंतर प्रक्रिया उद्योग बंद पाडण्याचे प्रयत्न स्थानिक प्रशासन करत आहे अशा मनमानी कारभाराला औद्योगिक संघटनांचा विरोध असून काही वर्षे कोरोनासोबत वाटचाल करावी लागणार असे केंद्र व राज्य सरकारचे म्हणणे आहे तरी त्याला अनुसरूनच उद्योगांबाबतची नियमावली असणे गरजेचे आहे. या मागणीचे निवेदन इंजिनिअरिंग औद्योगिक संघटनांच्यावतीने राजेंद्र पाटील यड्रावकर यांना देण्यात आले. मंत्री महोदय यांनी यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
यावेळी मागणीचे निवेदन देताना उत्कर्ष उद्योजक संस्थेचे अध्यक्ष गणेश भांबे, उपाध्यक्ष संजय चौगुले इचलकंरजी इंजिनियरिंग असोसिएशनचे हेमंत कुलकर्णी, स्लीमाचे संजीव मालू शीतल केटकाळे लघुउद्योग भारतीचे संतोष सुतार, ल. का. अकिवाटे औद्योगिक वसाहतचे सुधीर अकीवाटे, गजानन मानधना आदी उपस्थित होते.