राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणाच्या अहवालातील निष्कर्ष : गर्भवती महिलासुद्धा अत्याचाराच्या बळी
प्रतिनिधी /बेळगाव
कोविडकाळात विवाहित महिलांना कौटुंबिक हिंसाचाराला सामोरे जावे लागले तर तरुणींना लैंगिक अत्याचारांना बळी पडावे लागले, असा धक्कादायक निष्कर्ष राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणाच्या अहवालातून उघड झाला आहे. दुर्दैवाने गेल्यावेळी झालेल्या सर्वेक्षणाच्या तुलनेत हे प्रमाण वाढले आहे. 18 ते 29 वर्षे वयाच्या महिलांना लैंगिक अत्याचाराची शिकार ठरावे लागले आहे.
कोविडकाळात कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांनी मारहाण, ढकलाढकली, त्यांच्यावर काही वस्तू फेकणे, केस ओढणे, लाथा आणि बुक्मयांनी मारणे, दरादर ओढून नेणे अशा अनेक पद्धतीचे अत्याचार सहन केले आहेत. तर पतीनेच केलेल्या छळाचे प्रमाण ग्रामीण भागात अधिक म्हणजेच 49 तर शहरी भागात 48 टक्के आहे. 18 ते 49 वयोगटातील 8 टक्के महिलांना त्यांच्या इच्छेविरुद्ध पतीशी शारीरिक संबंध ठेवावे लागले आहे. 6 टक्के महिलांनी पतीच्या धमक्मयांना घाबरून संमती द्यावी लागली, असे स्पष्ट केले आहे.
कोविडकाळात कौटुंबिक हिंसाचार वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे पुरुष कार्यालयाला न जाता घरातच राहिले, हे आहे. शिवाय पतीने नशापान केले असेल तर त्याच्या इच्छेसमोर मान तुकविण्यापलीकडे आपण काहीच करू शकत नव्हतो, असे स्पष्ट केले आहे. संपूर्ण व्यवस्थाच ही पुरुषसत्ताक व्यवस्था असल्याने बाहेरच्या जगातही आपल्याला न्याय मिळेल याची खात्री नाही, असेही पीडित महिलांनी सांगितले आहे.
इतकेच नव्हे तर 18 ते 49 वयोगटातील गर्भवती महिलासुद्धा अत्याचाराच्या बळी ठरल्या आहेत. यापैकी बऱयाच महिलांनी जखम होणे, हाडे मोडणे, दात तुटणे असे आघात सहन केले आहेत. दुर्दैव आणि सखेद आश्चर्याची बाब म्हणजे 82 टक्के पुरुषांना पत्नीला मारहाण करण्यामध्ये काहीच गैर वाटत नाही. तिने घराकडे दुर्लक्ष केले, सासू-सासऱयांना मान दिला नाही किंवा ती निष्ठावान नसेल तर तिला मारहाण होण्यात गैर नाही, असे पुरुषांना वाटते, असेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.