प्रतिनिधी / म्हापसा
राज्यात जरी कोविड केसेस वाढल्या असल्या तरी हे सरकारचे दुर्लक्ष म्हणता येणार नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सुरुवातीपासून काळजी घेतली आहे त्यामुळे आम्ही ग्रीन झोनमध्ये आहोत. आता केसेस वाढल्या त्या इनपुट आहेत. बाहेरून जे लोक आले आहेत जे गोमंतकीय आहेत त्यांनाच ही लागण झाली आहे. मात्र ते कुठेही फिरले नाही. आले तसेच त्यांची तपासणी झालेली आहे. तपासणीवेळीच ते पॉझिटीव्ह मिळाले. त्यामुळे अन्य गोमंतकीयांना भिण्याचे कारण नाही अशी माहिती उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांनी दिली.
म्हापसा येथे कार्यक्रम आटोपल्यानंतर पत्रकारांनी त्यांना घेरले असता उपमुख्यमंत्र्यांनी वरील माहिती दिली. ते म्हणाले की, राज्यात हे तयार झाले नाही. मुख्यमंत्र्यांनी याबाबत योग्यवेळी योग्यरीत्या काळजी घेतली आहे. राज्यात येणाऱया रेल्वे त्वरित बंद झाल्या पाहिजे काय असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना केला असता ते म्हणाले, एमएचचे काही गाईडलाईन असतात त्यांचे पालन मनात नसतानाही करावे लागते. असे ते म्हणाले. तशा पद्धतीत हे घडू नये. गोव्याबाहेरील लोक जे आलेत त्यांनाच आढळून आले आहे. मिक्स झाले व त्याची लागण झाली असे काही नाही. राज्यात केसेस वाढू लागल्याने त्याची लागण होऊ नये म्हणून सर्वांनाच रेल्वे बंद व्हायला पाहिजे असे वाटणारच. जे बाहेरून गोमंतकीय राज्यात परततात त्यांना यावेच लागेल.
सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त
मुंबईत कोविड मोठय़ा प्रमाणात परसल्याने ते राज्यात बेकायदेशीररीत्या येऊच शकत नाही. आणि कुठल्याच चेकनाक्यावरून आत येऊ शकत नाही. सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्यातील पोलिसांनी कडक धोरण अवलंबविले आहे त्यामुळे बॉर्डरवर सीआरपीएफ हे केंद्रीय राखीव दलाच्या पोलिसांची आवश्यकता नाही असे उपमुख्यमंत्री श्री. वळेकर यांनी स्पष्ट केले. चोरवाटा आहेत त्या ठिकाणी पोलीस पहारा ठेवला आहे.