प्रतिनिधी / बेळगाव
लॉकडाऊनमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आल्याने आज बऱयाच संस्था गरजूंना मदत करत आहेत. त्यामुळे आपणही या कार्यात हातभार लावावा या हेतूने कोविड वॉरियर आणि शेट्टी फौंडेशनच्यावतीने गेल्या 25 दिवसांपासून गरजूंना जेवण, पाण्याची बाटली आणि बिस्कीटे देण्यात येत आहेत. किल्ला परिसर, रेल्वे स्टेशन, हॉस्पिटलसह अन्य ठिकाणी असलेल्या नागरिकांना मदत करण्यात येत आहे. दररोज सुमारे 300 ते 400 पाकिटे वाटप करण्यात येत आहेत. या कार्यासाठी श्रवण शेट्टी, अमृता चौगुले, रवी चौगुले, प्रियांका चौगुले, रोहित पाटील, वेंकटेश तपाडिया, अक्षय बोंगाळे, ऐश्वर्या श्रेयकर मदत करत आहेत.