रत्नागिरी आणि सिंधुदुर्गबरोबरच साऱया जिह्यांच्या बाबतीत रुग्णसंख्या घसरत असल्याचे दिसून येत आह़े पुढच्या काळात कोव्हिड नियंत्रणात येईल, अशी चिन्हे आहेत़
जागतिक स्तरावर कोरोना व्हायरसची महामारी आटोक्यात यावी म्हणून सातत्यपूर्ण प्रयत्न होत आहेत़ भारतात रुग्णसंख्येत दररोज उतार पडल्याचे अलीकडच्या आकडेवारीतून दिसून येत आह़े रत्नागिरी आणि सिंधुदुर्गबरोबरच साऱया जिह्यांच्या बाबतीत रुग्णसंख्या घसरत असल्याचे दिसून येत आह़े पुढच्या काळात कोव्हिड नियंत्रणात येईल, अशी चिन्हे आहेत़ परंतु त्याचबरोबर काळजी घेण्याचे आवाहनही केले जात आह़े
रत्नागिरी जिह्यातील खेड तालुक्यातील लवेल येथे घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थी वसतिगृहात कोव्हिड उपचार केंद्र सुरू करण्यात आले होत़े सार्वजनिक आरोग्य विभागाची सारी व्यवस्था त्यासाठी कामी आली होत़ी वाढत्या रुग्णसंख्येमुळे उपचारासाठी जागा कमी पडू लागली होत़ी म्हणून वसतिगृहाचे कोव्हिड उपचार केंद्र तयार करण्यात आले होत़े या ठिकाणी आतापर्यंत 700 हून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आल़े 170 बेड्ससाठी आवश्यक तो कर्मचारी वर्ग नेमण्यात आला होत़ा आता दिवसेंदिवस रुग्णसंख्या कमी होत असल्याने खासगी जागेतील हे उपचार केंद्र बंद करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आह़े यापुढे खेड परिसरातील रुग्ण शासकीय व्यवस्थेतील कळंबणी पेंद्रात दाखल केले जाणार आहेत़
उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले, रत्नागिरीच्या शासकीय रुग्णालयाला कोव्हिड रुग्णालय म्हणून जाहीर करण्यात आले होत़े दिवसेंदिवस रुग्णसंख्या कमी होत आह़े भविष्यात कोरोना आटोक्यात येण्याची शक्यता दिसत आह़े रत्नागिरीच्या शासकीय रुग्णालयाचा कोव्हिड रुग्णालय म्हणून असलेला दर्जा रद्द करून ते सामान्य रुग्णालय म्हणून येत्या काही दिवसात कार्यरत होईल़ रत्नागिरी परिसरातील कोरोना रुग्णांना पर्यायी असलेल्या महिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येईल़ रत्नागिरी नगर परिषदेने सुरू केलेल्या रुग्णालयात पोस्ट कोव्हिड सेंटर सुरू केले जाईल. कोव्हिड झाल्यानंतर रुग्णांना दिसणाऱया लक्षणांवरील मार्गदर्शनासाठी हे केंद्र र ाहिल. सर्वसामान्यांना या मार्गदर्शनाची गरज आहे. राज्यातील ते पहिले रुग्णालय आहे. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी, समुपदेशक, परिचारिका व इतर स्टाफ काम करणार आहे.
सिंधुदुर्ग जिह्यातही कोरोना रुग्णसंख्येला उतार सुरू झाला आह़े तेथील जिल्हाधिकाऱयांनी देखील लवकरात लवकर कोरोनामुक्तीची अपेक्षा बाळगली आह़े या वाटचालीत कोठेही ढिलाई ठेवण्यात येऊ नये असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने केले आह़े मे महिन्यात आणि गणपतीत लोकांची मुंबई-पुण्यात आवक जावक वाढली होत़ी त्याचा परिणाम म्हणून कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली होत़ी या पार्श्वभूमीवर सध्या मिळणारा उतार ही बाब महत्त्वाची झाली आह़े
रत्नागिरी जिह्यात सध्या कोरोना चाचण्या दोन प्रकारे घेतल्या जातात़ अँटीजन रॅपीड टेस्ट व आरटीपीसीआर अशा प्रकारच्या दोन चाचण्या होतात़ दोन्ही मिळून दरदिवशी या चाचण्या एक हजार पर्यंत नेल्या पाहिजेत, असे तज्ञांनी सुचवलेले प्रमाण आह़े तथापि, महामारी सुरू झाल्यानंतर आजपर्यंत कधीही रत्नागिरी जिह्याने हा आकडा गाठलेला नाह़ी कोरोनाला मर्यादित ठेवायचे असेल तर चाचण्या वाढवल्या पाहिजेत़ हे जागतिक सर्वमान्य गृहितक असले तरी प्रत्यक्षात अंमलबजावणीच्या स्तरावर खूप अडचणी येत आहेत़ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील अनेक कर्मचारी अँटीजन टेस्ट करवून घेण्यासाठी पुढे येत नाहीत, अशा तक्रारी येत आहेत़ या कर्मचाऱयांच्या मनातील भय काढून टाकण्याचे काम वरिष्ठ अधिकाऱयांकडून अपेक्षित आह़े सध्या ते होताना दिसत नाह़ी प्रत्येक रुग्णाचा गेल्या 14 दिवसातील प्रवास इतिहास नोंदवून घेऊन त्यात संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींच्या चाचण्या करून घेण्याचा व्यापक कृती कार्यक्रम सध्या होत नाह़ी यामुळे कोरोना मुक्तीच्या कितीही चर्चा झाल्या तरी प्रत्यक्षात ती स्थिती येण्यासाठी दीर्घकाळ जाईल अशी भीती व्यक्त होत आह़े सध्या लांबलेल्या पावसाने कोकणपट्टीत लोकांना हैराण केले आह़े थंड वातावरण व दमटपणा यामुळे सध्या कमी होत असलेला कोरोना रोगाचा पुन्हा उद्रेक होणारच नाही याची हमी देणे अवघड असल्याचे वैद्यकीय अधिकाऱयांचे म्हणणे आह़े हा रोग नवा आह़े त्याच्याविषयी अद्याप शास्त्रज्ञांनादेखील सर्व गोष्टींचा पत्ता लावणे शक्य झालेले नाह़ी म्हणून अखंड सावधानता बाळगावी म्हणून आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी सातत्याने सांगत आहेत़
कोरोना काळात आरोग्य यंत्रणा सुधारली जावी म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत अशा घोषणा ठिकठिकाणाहून करण्यात येत होत्य़ा प्रत्यक्षात रत्नागिरी जिल्हा स्तरावर मनुष्यबळ उभारणीकरिता सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये फारच अल्प प्रयत्न झाल्याचे दिसून येत आह़े या प्रयत्नांच्या पाठीमागे प्रामाणिकपणा देखील कितपत होता असा संशय घेण्यास पुरेशी जागा आह़े पॅरामेडिकल कर्मचारी वर्गाच्या जागा रिकाम्या असताना त्या तशाच रिक्त ठेवून कोव्हिड काळासाठी तात्पुरती नोकर भरती करण्यात आल्याचे दिसून येत आह़े नियमित जागांवरची भरती होत नसल्याने आरोग्याचा प्रश्न स्थायी स्वरूपात सुटावा याकरिता प्रयत्न झाल्याचे दिसत नाह़ी कोणत्याही आपत्तीतून काही चांगल्या बाबी पुढे येत असतात़ आरोग्य यंत्रणा सक्षम होण्यासाठी पुरेशी साधनसामुग्री सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेकडे आली असे म्हणणे धाडसाचे ठरणार आह़े
सुकांत चक्रदेव