दुबई
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने टी-20 क्रिकेटमध्ये (आंतरराष्ट्रीय, स्थानिक, प्रँचायझी) दहा हजार धावांचा टप्पा रविवारी पूर्ण केला. रविवारी झालेल्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात त्याने हा माईलस्टोन गाठला.
314 व्या टी-20 सामन्यात खेळताना कोहलीने डावातील चौथ्या षटकात मुंबईच्या बुमराहला पुलचा षटकार ठोकत हा टप्पा सर केला. या सामन्याआधी त्याला हा टप्पा गाठण्यासाठी 13 धावांची गरज होती. रविवारच्या सामन्याआधी त्याने 298 डाव खेळले होते आणि 41.61 च्या सरासरीने त्याने धावा काढल्या असून त्यात 5 शतके, 73 अर्धशतकांचा समावेश आहे. 113 ही त्याची वैयक्तिक सर्वोच्च कामगिरी असून 134 हून अधिक त्याचा स्ट्राईक रेट आहे.