शुभेच्छांच्या वर्षावात ‘तरुण भारत’ चिंब
प्रतिनिधी/ सातारा
मार्च 2020 मध्ये कोरोनाचे संकट जगावर आले. या महासंकटाचा अगदी सर्वसामान्य घटकांवर परिणाम झालेला आहे. कोरोनाची पहिली लाट गेली. दुसरी लाट निवळली तरीही अजून कोरोना गेलेला नाही. त्यामुळे शासनाच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्या सूचनांची अंमलबजावणी करत ‘तरुण भारत’ने सातारा आवृत्तीचा 26 वा वर्धापन दिन कौटुंबिक सोहळय़ाने साजरा केला. छोटेखानी कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये जिह्यातील वाचक, जाहिरातदार, हिंतचिंतकांनी प्रत्यक्ष तसेच फोनवरुन भरभरुन शुभेच्छा दिल्या. दरम्यान, यावेळी तरुण भारतच्या पत्रकार व विक्रेत्यांना संपादक जयवंत मंत्री यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.
कोरोनाचे संकट हे अजून गेलेले नाही. प्रत्येकजण अजून त्यांच्या झळा सोसतो आहे. प्रत्येकजण अजूनही कोरोनाच्या भितीतच आहे. मार्च 2020 मध्ये जगासह जिह्यावर आलेले हे कोरोनाचे संकट हळुहळू सावरत असले तरीही ते पूर्णपणे गेले नाही. डेल्टा, ओमिक्रोनसारखे नवीन व्हेरियंट अजूनही झोप उडवत आहेत. प्रशासन त्या अनुषंगाने निर्बंध लादू पहात आहे. याच कोरोनाच्या अनुषंगाने ‘तरुण भारत’ने यावर्षी सातारा आवृत्तीचा वर्धापन दिन अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कोणताही डाम डौल न करता अगदी शासनाच्या नियमाप्रमाणे कौटुंबिक सोहळय़ाचे आयोजन साताऱयातील प्रभूसृष्टी येथे संपादक जयवंत मंत्री यांच्या उपस्थितीत पार पडला.
या सोहळयाला वितरण व्यवस्थापक अभिजित ब्रम्हदंडे, सातारा आवृत्तीचे प्रमुख दीपक प्रभावळकर, जाहिरात विभाग प्रमुख संजय जाधव, डेस्क इनचार्ज राजेंद्र वारागडे, कराड कार्यालय प्रमुख देवदास मुळे, ऍडमिनीस्टेशन ऑफिसर सागर कोठावळे, वितरण विभाग प्रमुख मंदार कोल्हटकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला. वर्धापन दिनानिमित्ताने तरुण भारत कार्यालयात सत्यनारायण महापूजा करण्यात आली. आकर्षक विद्युत रोषणाईने कार्यालय उजळून निघाले होते. कार्यालयाच्या प्रवेशद्वारात रांगोळय़ाच्या पायघडय़ा काढण्यात आल्या होत्या.
‘तरुण भारत’वर शुभेच्छांचा वर्षाव
‘तरुण भारत’ दैनिक जनसामान्यांचा आवाज आहे. तळागाळातील उपेक्षितांपासून समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तींचे आपले हक्काचे व्यासपीठ आहे. याच व्यासपिठांचा 26 वा वर्धापन दिन सोहळा असल्याने सकाळपासून ‘तरुण भारत’च्या कार्यालयात शुभेच्छा दिल्या जात होत्या. खासदार उदयनराजे, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार महेश शिंदे, आमदार जयकुमार गोरे, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार दीपक चव्हाण, आमदार पृथ्वीराज चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उद्योजक सुशिल मोझर यांच्यासह वाचक, हितचिंतक, जाहिरातदार यांनी ‘तरुण भारत’ला शुभेच्छा दिल्या.
पत्रकार, विक्रेत्यांचा संपादकांच्या हस्ते सन्मान
तरुण भारतच्या 26 वर्षाच्या वाटचालीत ज्यांनी सहकार्य केले. तसेच कोरोना काळातही पत्रकारांनी प्रचंड मेहनत घेतली. त्याबद्दल तरुण भारतचे संपादक जयवंत मंत्री यांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर तरुण भारत घरोघरी पोहोचवण्यासाठी परिश्रम घेणाऱया ।विक्रेत्यांचाही यावेळी उचित सत्कार करण्यात आला. या गौरवाने क्षणभर सगळय़ांना भरुन आले.
लवकरच भव्य सोहळा होणार
जिल्हय़ासह राज्यात कोरोना अन् ओमिक्रॉनची धास्ती आहे. त्यामुळे प्रशासनातर्फे कोरोनाचे निर्बंध आहेत. या निर्बंधामुळे दरवर्षी मोठय़ा डामडौलाने होणारा तरुण भारतचा वर्धापन दिन यावर्षी कौटुंबिक सोहळय़ाने झाला. परंतु कोरोनाचे निर्बंध कमी होताच लवकरच भव्य सोहळा करण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.