वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2021 च्या राष्ट्रीय क्रिकेट हंगामाला रविवारपासून सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 लीग स्पर्धेने प्रारंभ झाला. या स्पर्धेतील सामने सहा विविध शहरामध्ये खेळविले जात आहेत. दरम्यान या स्पर्धेतील सामने भरविणाऱया सहा राज्यांच्या क्रिकेट संघटनांच्या यजमानपद मानधनात तसेच या स्पर्धेत खेळणाऱया क्रिकेटपटूंच्या मानधनामध्ये वाढ करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने (बीसीसीआय) घेतला आहे.
मुश्ताक अली करंडक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यांचे यजमानपद भूषविणाऱया संबंधित राज्यांच्या क्रिकेट संघटनांना आता 2.5 लाखा ऐवजी 3.5 लाख रूपयांचे मानधन दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेत खेळणाऱया प्रत्येक खेळाडूंला सामना मानधन 50 हजार ऐवजी 75 हजार रूपये मिळणार आहेत. कोरोना महामारी समस्येमुळे राष्ट्रीय क्रिकेट हंगामाला विलंब झाल्याचे मंडळाच्या प्रवक्त्याने सांगितले. यजमानपद भूषविणाऱया संबंधित राज्यांच्या क्रिकेट संघटनांना मंडळाचे सचिव जय शहा यांनी ही माहिती लेखी स्वरूपात पाठविली आहे. मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धेतील सामने मुंबई, बडोदा, इंदोर, कोलकाता, चेन्नई, बेंगळूर आणि अहमदाबाद येथे खेळविले जात आहेत.