ऑनलाईन टीम / पुणे :
शिक्षण घेताना क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीसाठी वेळ मिळत नाही. क्रीडा पटूना स्थैर्य मिळावे म्हणून सरकारी नोकऱ्या , आस्थापनांमध्ये पाच टक्के आरक्षण आहे, स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्यास सवलत आहे, मात्र याबाबत जागृती होण्याची गरज आहे, ‘ अशी अपेक्षा स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शक सतीश पाटील यांनी व्यक्त केली.
पी.ए. इनामदार आय.ए.एस.एक्झाम सेंटर आणी आझम स्पोर्टस् ऍकॅडमी आयोजित क्रीडा क्षेत्रात चमकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सतीश पाटील बोलत होते. ही कार्यशाळा ४ फेब्रुवारी रोजी आझम कॅम्पस येथे झाली.
स्पर्धा परीक्षांच्या खुल्या गटात क्रीडापटूंना गुणांची सवलत मिळते. थोडया अभ्यासानेही यश मिळते. ही संधी क्रीडापटूंनी घेतली पाहिजे. उमेदीची वर्षे क्रीडा क्षेत्रात दिल्यानंतर सरकारी सेवेत योगदान दिले पाहिजे.आपल्या कुटुंबीयांनाही समाधान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
पोलिस अधिकारी परीक्षेत शारीरिक क्षमता चाचणीत क्रीडापटूंना त्यांच्या क्षमतांचा लाभ होतो.आझम स्पोर्टस् अकादमीचे मजीद सय्यद यांनी मार्गदर्शन केले.आगामी काळात विविध पदांसाठी राज्य सरकार ७२ हजार जागा भरल्या जाणार आहेत. त्यात पाच टक्के आरक्षण क्रीडापटूंसाठी असणार आहे.पदवी असणे ही प्राथमिक अट आहे. ३८, ४३ व्या वर्षापर्यंत क्रीडापटूं या परिक्षा देऊ शकतात. किमान दीड वर्ष वेळ स्पर्धा परीक्षा तयारीसाठी देण्याची तयारी ठेवली पाहिजे.एनसीआरटी पुस्तकांची अभ्यासात मदत होते, असे पाटील यांनी सांगितले.