क्रेझ कॅम्पस इंटरव्हय़ूची
शिक्षण घेत असतानाच अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात याकरिता विविध कंपन्यांच्या माध्यमातून कॉलेज आवारामध्येच मुलाखती घेतल्या जातात. असे ‘कॅम्पस इंटरव्हय़ू’ विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये महत्वाचे ठरत आहेत. अधिकाधिक चांगल्या कंपन्या आणून आपल्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्याकरीता कॉलेज व्यवस्थापनाचीही धडपड सुरू असते. त्यामुळेच प्रत्येक कॉलेजमध्ये अशा कॅम्पस इंटरव्हय़ूचे आयोजन केले जात आहे.
कॉलेज जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढावा याकरिता असे इंटरव्हय़ू आयोजित केले जातात. पुणे, मुंबई, बेंगळूर येथील मल्टीनॅशनल कंपन्यांना कर्मचाऱयांची गरज असते. परंतु कौशल्य प्राप्त विद्यार्थी मिळत नसल्यामुळे कॉलेज जीवनातच विद्यार्थ्यांना नोकरी व शिक्षण एकत्रितपणे देत त्यांना तयार केले जाते. यामुळे विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा होताना दिसत आहे.
कंपन्यांची पारख गरजेचीच
काही कॉलेज कंपन्यांची खातरजमा न करता कॅम्पस इंटरव्हय़ूला बोलाविले जाते. निवड झाल्यानंतर काही दिवसांनी विद्यार्थ्यांना आपली फसगत झाल्याचे प्रकारही घडले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसानाबरोबरच आर्थिक तोटाही सहन करावा लागत आहे. त्यामुळे कॉलेज व्यवस्थापनाने कंपन्यांची पारख करणे तितकेच गरजेचे आहे.
डॉ. प्रसाद दड्डीकर
(संचालक, भरतेश एमबीए कॉलेज)
कॅम्पस इंटरव्हय़ूमुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असतानाच नोकरीची संधी मिळते. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढीस लागतो. सध्या आम्ही कॉलेजमध्ये व्हीडिओ रिझ्यूम ही पद्धत सुरू केली असून मोठय़ा शहरातील कंपन्यांना पाठवून दिले जातात. त्याचबरोबर कॉलेजच्या वेबसाईटवरही ते अपलोड केले जातात. यामुळे कंपन्यांना ज्या पद्धतीचा कर्मचारी हवा त्याची निवड ते करू शकतात. यामुळे विद्यार्थी व कंपन्यांचा वेळ व पैसा वाचतो.
स्वाती जोग (प्लेसमेंट ऑफिसर)
एमबीए मधून प्रोफेशनल टेनिंग दिले जाते. विद्यार्थ्यांना चांगल्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळावी, ही संस्थेची पहिली अपेक्षा असते. त्यानुसार कंपन्यांची गुणवत्ता पाहूनच त्यांची निवड केली जाते. चांगले पगार देणाऱया कंपन्याही कॅम्पस इंटरव्हय़ू मधून विद्यार्थ्यांची निवड करत असतात. त्यामुळे कॅम्पस इंटरव्हय़ू हे विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्वाची पायरी म्हणून ओळखली जाते.
कीर्ती (विद्यार्थिनी)
प्रत्येकजण नोकरी मिळावी, या आशेनेच कॅम्पस इंटरव्हय़ूमध्ये जातो. यामुळे शिकत असतानाच नोकरी करण्याचा आत्मविश्वास मिळतो. बाहेर इतर ठिकाणी जाऊन नोकरीसाठी फिरण्यापेक्षा कॅम्पसमधून निवड झाल्यास त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होतो.
दिव्या वाली (विद्यार्थिनी)
कॅम्पस इंटरव्हय़ूमधून पुढाकार घेण्याच्या वृत्तीमुळे नेतृत्व गुण वाढीस लागतात. यामुळे देहबोलीदेखील सुधारते. मुलाखतकारासमोर कशा पद्धतीने बसायचे, उत्तरे कशी द्यायची याची माहिती मिळते. तसेच मनावर असणारे दडपणही कमी होते.
वाणेश्री (विद्यार्थिनी)
शिक्षण झाल्यानंतर नोकरीसाठी अनेकवेळा फसगत होते. त्यामुळे कॅम्पस इंटरव्हय़ू हा महत्वाचा टप्पा असतो. कॉलेजतर्फे कंपन्यांची निवड पारखूनच होत असल्यामुळे याठिकाणी नोकरी मिळाल्यास चांगला पगारही मिळतो. त्यामुळे विद्यार्थी कॅम्पस इंटरव्हय़ूची तयारी करत असतात.
सुशांत कुरंगी