तहसीलदारांकडून परवान्यासाठी अर्ज, नियमावली पालनासाठी कडक निर्बंध
वार्ताहर / खानापूर
कोरोना संक्रमणाच्या धास्तीने प्रशासनासह सर्वसामान्य नागरिकांची मोठी कोंडी झाली आहे. गतवर्षी कोरोना विषाणुच्या संक्रमणाने जगभरासह देशात एकच दहशत माजली. भारत देशानेही या कोरोनावर विजय मिळविल्याचे घोषित केले. मात्र या संक्रमणाचा अंश भारतात पुन्हा शिरलाच. मागील वषी मार्च महिन्याच्या अखेरच्या काळात संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये अडकला. अन् विवाह समारंभासह धार्मिक, सांस्कृतिक समारंभासह कार्यक्रम थांबले. एप्रिल, मे महिना हा विवाह समारंभाचा असल्याने या दोन महिन्यात अनेकजण विवाह बंधनात अडकतात. यावषी या दोन महिन्यामध्ये अनेक कुटुंबाच्या दारात शुभमंगल वाजणार असतानाच क्लोजडाऊन परिस्थीतीमुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे. बुधवारपासून आगामी 14 दिवस क्लोजडाऊन काळामध्ये खानापूर तालुक्मयात 150 हून अधिक ठिकाणी विवाह सोहळय़ांचे आयोजन करण्यात आले असून खानापूर तहसील कार्यालयाकडून अनेकांनी परवानाही घेतला आहे. परंतु कडक नियमावलींचे पालन करत सुरक्षितता राखण्यासाठी मात्र शुभमंगल करणाऱयांची बरीच कसरत होत आहे.
बुधवारी क्लोजडाऊनच्या पहिल्या दिवशी खानापूर तालुक्मयात तब्बल 27 हून अधिक ठिकाणी विवाह सोहळय़ांचे आयोजन करण्यात आले होते. या बहुतांश विवाह सोहळय़ांच्या ठिकाणी नियमावलींचे पालन करण्यासाठी अनेकांना प्रयत्न करावे लागले. बहुतांश ठिकाणी मोठी गर्दी झाल्याचेही निदर्शनाला आले. यामुळे खानापूर तहसीलदार रेश्मा तालीकोटी यांनी ज्या-ज्या ठिकाणी परवाना घेतलेला आहे. अशा ठिकाणी जाऊन पाहणी केली. व कोरोना संक्रमणासंदर्भात जागृतीही केली.
सध्या क्लोजडाऊनचा काळ सुरू असला तरी शुभमंगल व अंत्यसंस्कारासाठी परवानगी दिली जात आहे. विवाह सोहळय़ांसाठी केवळ 50 जणांना उपस्थिती अनिवार्य असून यासाठी पास दिले जात आहेत. मात्र यासाठीही या परवान्याबरोबर काही नियम व अटीही लादण्यात आल्या आहेत. विवाह समारंभाला 65 वर्षापेक्षा अधिक वयस्क तसेच गर्भवती महिला व दहा वर्षाखालील बालकांना उपस्थित राहण्यास निर्बंध आहे. प्रवेशद्वारावर तसेच परिसरात सॅनिटायझर तसेच येणाऱयांचे थर्मल स्क्रिनींग करणे गरजेचे आहे.
विवाह सोहळय़ात भाग घेणाऱया व्यक्तीना, ताप, सर्दी, खोकला लक्षणे असणाऱयांना अवकाश देऊ नये. समारंभाला उपस्थित राहणाऱयांनी मास्क वापरणे सक्तीचे असून प्रत्येकात दोन मिटर अंतर राखावे. मास्क असणाऱयांनाच विवाह समारंभात प्रवेश देण्यात यावा, वरील नियमावलींचे पालन न करणाऱयांवर 2005 कायदा कलम 51-60 तसेच भारतीय दंड नियम उल्लंघन आधारीत कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सक्त आदेश देण्यात आले आहेत.
तालुक्मयात 150 ठिकाणी विवाह समारंभ
आगामी 14 दिवसाच्या क्लोजडाऊन काळात तालुक्मयात 150 ठिकाणी विवाह समारंभासाठी अनेकांनी परवानगी घेतली आहे. तहसीलदार कार्यालयातून बुधवारपर्यंत देण्यात आलेल्या परवान्यामध्ये केवळ 10 मे पर्यंत मात्र परवानगी देण्यात आली आहे. त्यापुढील काळात होणाऱया विवाह समारंभासाठी राज्य सरकारची नवीन नियमावली काय राहणार? यावर परवाने देण्यात येणार असल्याचे तहसीलदार कार्यालयातून सुचीत करण्यात येत आहे. सद्यःपरिस्थितीत केवळ 10 मे पर्यंत विवाह सोहळय़ांचे आयोजन केलेल्यांना मात्र वरील नियमानुसार परवाने देण्यात आले आहे. यानुसार तालुक्मयात दि. 25 रोजी 44 ठिकाणी विवाह सोहळे पार पडले. त्याचप्रमाणे दि. 26 रोजी 18, दि. 27 रोजी 2, दि. 28 रोजी 4, दि. 29 रोजी 28, दि. 30 रोजी 24 तर 1 मे रोजी 7, दि. 2 मे रोजी 21, 3 मे रोजी 14, दि. 4 मे रोजी 9 व दि. 5 मे रोजी 11, दि. 6 मे रोजी 1, दि. 8 मे रोजी 5 याप्रमाणे विवाह सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले आहे.