जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज
@ प्रतिनिधी/ बेळगाव
परराज्यांतून आलेल्या नागरिकांना तसेच संशयितांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येत आहे. त्यांना योग्य प्रकारे सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. जेवण व नाष्टा वेळेत मिळत नाही. याचबरोबर काही ठिकाणी शौचालयांची समस्या निर्माण होत असल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्हा प्रशासन त्यांच्यासाठी सर्व ते प्रयत्न करत आहे. मात्र त्यांच्यापर्यंत काहीवेळा कोणीच पोहोचत नाही, असे सांगण्यात येत आहे.
परराज्यांतून मोठय़ा प्रमाणात कामगार तसेच नागरिक राज्याकडे फिरत आहेत. बेळगाव जिल्हय़ात निपाणीपासून प्रवेश देण्यात येत आहे. कोगनोळी नाक्मयाजवळच त्यांची सर्व ती आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने त्यांना त्यांच्या गावाला तसेच शहरामध्ये पाठवून संबंधितांना क्वारंटाईनमध्ये ठेवले जात आहे. क्वारंटाईनमध्ये ठेवल्यानंतर जिल्हा प्रशासनामार्फतच जेवणाची तसेच इतर व्यवस्था करण्यात येत आहे.
काही जणांना हॉटेल, मंदिरे, कार्यालये, शाळा तसेच इतर ठिकाणी ठेवण्यात येत आहे. काही ठिकाणी शौचालये नसल्यामुळे समस्या निर्माण होत आहेत. काही ठिकाणी 1 ते 2 शौचालये आहेत. त्या ठिकाणी 100 हून अधिक जणांना ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बऱयाचवेळा उघडय़ावरच शौचालयाला जाण्याची वेळ या क्वारंटाईन व्यक्तींवर येत आहे. तेव्हा जिल्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.