वार्ताहर / सलगरे
खटाव (ता. मिरज ) येथील ग्रामपंचयात बरखास्त करून ग्रामविकास अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाकडून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
खटाव तालुका मिरज येथील ग्रामपंचायतीने गेल्या पाच वर्षापासून मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी असणारा 15 टक्के निधी, अपंगासाठी असणारा तीन टक्के निधी आणि महिला बालकल्याणसाठी असणारा दहा टक्के निधी खर्च केला नसल्यामुळे खटाव ग्रामपंचायत बरखास्त करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाकडून करण्यात आली आहे.