शहराच्या या भागात खड्डेच खड्डे : वाहनधारकांना अपघाताचा धोका
प्रतिनिधी / बेळगाव
गेल्या तीन-चार दिवसांपासून पडत असलेल्या परतीच्या पावसामुळे सर्वत्र पाणी पाणीच झाले आहे. इतर ठिकाणी साचलेले पाणी गटारीमार्गे वाहून जाते. मात्र, रस्त्यावर खडय़ात साचलेले पाणी त्याच ठिकाणी साठून राहिल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे.
शहरात रुपाली टॉकीजनजीक अनेक खड्डे पडले आहेत. या खड्डय़ात पाणी साचून राहिल्यामुळे वाहनधारकांना या मार्गावर जाणे कठीण बनले आहे. रस्त्यावरून वाहने जोराने गेल्यास सर्व पाणी इतर नागरिकांच्या अंगावर उडत आहे. त्यामुळे येथे पडलेल्या खड्डय़ांची तात्पुरती दुरुस्ती करून साचलेले पाणी जाण्यासाठी वाट मोकळी करून द्यावी, अशी मागणी वाहनधारक करीत आहेत.