जेष्ठ नेते विजयसिंह जाथव
वारणानगर / प्रतिनिधी
केंद्राने दरवाढ केल्याने रासायनिक खतांचे दर वाढले असून खतांच्या दरवाढी विरोधात जे पक्ष,संघटना रस्त्यावर आंदोलनात उतरतील त्यांच्या सोबत जनसूराज्य शक्ती पक्ष देखील सर्व शक्तीनिशी उतरणार असल्याची माहिती जनसुराज्य शक्ती पक्षाचे जेष्ठ नेते विजयसिंह जाधव यानी दिली.
केंद्र सरकारच्या धोरणामुळे गेल्या सहा वर्षात शेती मालाला योग्य भाव मिळत नाही मात्र रासायनिक खतांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत उद्योग धंदे कोलमडले आहेत, नोकर भरती बंद आहे त्यामुळे बेरोजगारी वाढत चालली आहे, जीवनावशक वस्तूची प्रचंड महागाई वाढत आहे यात जनता, शेतकरी, तरुण वर्ग होरपळत असताना केंद्र सरकार ३७० कलम रद्द केले, फुलवामा स्ट्राईक, राममंदीर अशा प्रश्नाकडे लक्ष विचलीत करून देशातील जनतेच्या रोजी रोटीकडे दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात जनतेत असंतोष पसरला आहे असे विजयसिंह जाधव यानी सांगीतले.
आतंरराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाच्या किमती कमी असताना देखील सहा वर्षात पेट्रोल, डिझेलच्या किमतीत आज पर्यन्त पंचवीस रु. पर्यन्त वाढ झाली तेलाच्या किमतीच्या तुलनेत जीवनावशक वस्तूचे दर किती वाढले, खतांचे दर तर पाचशे हजार रू.पर्यन्त वाढले शेतकऱ्यांच्या शेती मालाचा भाव व जोड धंदा असणाऱ्या दुध व्यवसायाचा उत्पादकांना मिळणाऱ्या दरात पाच सहा वर्षात कोणतीच अपेक्षित वाढ झालेली नाही त्यामुळे केंद्राच्या धोरणाने सामान्य माणूस व शेतकरी, मजूर, बेरोजगार भरडला जात असून त्यांना न्याय मिळावा यासाठी शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न बनलेल्या खत दरवाढी विरोधात जनसुराज्य शक्ती पक्ष रस्त्यावर उतरणार असल्याचे विजयसिंह जाधव यानी सांगीतले.