जिह्यातील मिठाई व्यावसायिक आक्रमक : पालकमंत्र्यांनाही प्रसंगी घेराओ घालण्याच्या तयारीत
प्रतिनिधी /सातारा
गेली सोळा महिने लॉकडाऊनचे चटके साताऱयातील व्यापारी बांधव सोसत आहेत. गतवर्षी स्वातंत्र्यदिनाच्या सोहळयाला कोरोनाचे नियम पाळून मिठाई विक्रीची तयारी केली होती. अचानक जिल्हाधिकाऱयांनी स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशीच जिलेबी विकायची नाही, असा फतवा काढला अन् विक्रेत्यांचे कोटय़ावधी रुपयांचे नुकसान झाले. याहीवर्षी साताऱयातील जिलेबी विक्रेत्यांनी कर्ज काढून कच्चा माल आणून जिलेबीचे आंबवण घातले आहे. ते चार ते पाच दिवस भिजवत घालावे लागते. असे असतानाच जिल्हाधिकाऱयांनी अचानक जिलेबी विक्रीला मनाई केली तर शहर व जिह्यातील मिठाई व्यावसायिक आक्रमक होणार असून प्रसंगी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनाच घेरोओ घालण्याच्या तयारीत आहेत.
सातारा शहरात दरवर्षी स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिनाच्या सोहळय़ाला तब्बल 6 टन जिलेबी विक्री होत असते. तर जिह्यात 19 टन जिलेबीची एका दिवसात विक्री होत असते. त्याकरता जिलेबी विक्री करणारे मिठाई व्यावसायिक आठ दिवसांपासून तयारी करत असतात. जिलेबीसाठी कच्चा माल आणून त्याचे आंबवण घालून स्वातंत्र्यदिनच्या आदल्या दिवशी जिलेबी तयार करुन पहाटेच दुकाने लावली जातात. गतवर्षी कोरोनाच्या अनुषंगाने सर्व नियम पाळून शहर व जिह्यातील जिलेबी विक्रेत्यांनी तयारी केली होती. मात्र, अचानक जिल्हाधिकाऱयांनी जिलेबी विक्री करायची नाही असा फतवा काढला अन् तयार पेलेली जिलेबी व कच्चा माल वाया गेल्याने कोटय़ावधी रुपयांचा फटका बसला होता. यावर्षी स्वातंत्र्य दिनाला 75 वर्ष पूर्ण होत असून हिरक महोत्सवानिमित्ताने देशाने टोकिओ ऑलिपिंकमध्ये पदके जिंकली त्याचा आनंद साताऱयातही स्वातंत्र्यदिनी साजरा करण्याकरता जिलेबीची वाटप होणार आहे. असे असताना जिल्हाधिकाऱयांनी अद्याप जिलेबी विक्रीबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला गेला नाही.
स्वातंत्र्यदिनाला दोन दिवसांचा कालावधी उरला असून अचानक जिल्हाधिकाऱयांनी जिलेबी विक्री बंदीचा निर्णय घेतल्यास साताऱयातील व्यापाऱयांचे नुकसान होईल. त्यामुळे साताऱयातील व्यापारी आंदोलनाच्या पवित्र्यात असून प्रसंगी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनाच जिह्यातील मिठाई व्यावसायिक हे घेराव घालणार आहेत. दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मिठाई व्यावसायिकांना सवलत द्यावी, असे आदेश जाहीर केले आहेत. त्यामुळे राज्याचे आरोग्यमंत्र्यांचे आदेश जिल्हाधिकारी पाळणार काय असाही सवाल मिठाई विक्रेते करु लागले आहेत.