कोची / वृत्तसंस्था
केरळ उच्च न्यायालयाने शुक्रवारी एका सुनावणीदरम्यान खराब रस्त्यांच्या मुद्दय़ावरून संबंधित अधिकारी आणि अभियंत्यांना चांगलेच धारेवर धरले. रस्त्यांची देखभाल कशी करावी हे जर अभियंत्यांना माहीत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशा शब्दात न्यायालयाने संबंधितांना फटकारले. न्यायमूर्ती देवन रामचंद्रन यांच्या खंडपीठासमोर एका याचिकेची सुनावणी सुरू आहे. पावसाळा संपल्यानंतर आता खराब रस्त्यांबद्दलच्या तक्रारी न्यायालयाकडे येण्यास सुरूवात झाली आहे. यापूर्वी न्यायालयाने याविषयी अगदी नेमक्मया शब्दांत सूचना दिल्या होत्या. मात्र त्यांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष झाल्यामुळे या समस्येवर खंडपीठाने कठोर शब्दात भाष्य केले. न्यायालय संबंधितांना इतक्मया सहज या सूचना विसरू देणार नाही आणि जर ते विसरले असतील तर त्यांना त्यांच्या वैधानिक आणि संविधानिक कर्तव्यांची जाणीव करुन देण्यासाठी आम्ही आवश्यक ती कारवाई करू, असेही न्यायालयाने म्हटले आहे. तसेच जर इंजिनियर्सना रस्त्यांची देखभाल कशी करायची याची माहिती नसल्यास त्यांनी दुसऱयांना संधी द्यावी असे सुचवत बांधकाम विभागाकडे जर कौशल्यपूर्ण अभियंत्यांची कमतरता आहे काय? अशी विचारणाही सरकारला केली.