प्रतिनिधी/ बेळगाव :
खरीप पेरणीसाठी दिलेले सोयाबिन खराब असल्यामुळे सोयाबिन उगवले नाही. त्यामुळे शेतकऱयांना मोठा फटका बसला आहे. ट्रक्टर असलेल्या शेतकऱयांची बीपीएल कार्ड रद्द करण्यातआले आहे. महापूरामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱयांना नुकसान भरपाई मिळाली नाही, यासह इतर मागण्यांसाठी शेतकऱयांनी कृषी कार्यालयावर मोर्चा काढुन निवेदन दिले.
यावषी बैलहोंगल, कित्तूर आणि खानापूर तालुक्मयामध्ये जे सोयाबिन बियाणे दिली आहेत ती खराब निघाली आहेत. सोयाबिन उगवली नसल्यामुळे शेतकऱयांना मोठा फटका बसला आहे. ही पेरणी करण्यासाठी शेतकऱयाला मोठा खर्च आला आहे. तेंव्हा आता जिल्हा प्रशासनाने आम्हाला त्याची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. जानेवारी, फेब्रुवारी दरम्यान करण्यात आलेल्या पिकांचा सर्व्हे चुकीच्या पध्दतीने करण्यात आला आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱयांना नुकसान भरपाई मिळण्याऐवजी दुसऱयांनाच नुकसान भरपाई मिळाली आहे.
याचबरोबर ट्रक्टर असलेल्या शेतकऱयांचे बीपीएल कार्ड अचानक रद्द केले. यामुळे अन्याय झाला आहे. या सर्व मागण्यांसाठी शेतकऱयांनी कृषी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदविला. यावेळी रवी पाटील, आनंद बीवीन, ईराण्णा हुबळी, बसवंताप्पा हारुगोप्प, गोपाळ मारिहाळ, गुरुसिध्दाप्पा काद्रोळी, महांतेश हुद्दार, अर्जुन कुरी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.