प्रतिनिधी/ बेळगाव
खरीप हंगामाला लवकरच सुरुवात होणार आहे. बळीराजा मे महिन्यापासून शेतातील मशागतीला सुरुवात करत असतो. यावषीही पाऊस बऱयापैकी असल्याने शेतकऱयांमध्ये समाधान पसरले आहे. मात्र, शेतीला ऊर्जा देण्यासाठी कृषी विभागाने आतापासूनच तयारीला लागणे गरजेचे आहे. खरीप हंगामाचे उद्दिष्ट जाहीर होण्यापूर्वी शेतकऱयांना यासाठी मार्गदर्शन करणे महत्त्वाचे आहे. कोरोनाकाळात बळीराजा विविध संकटांना तोंड देत आहे. तेव्हा जिल्हा कृषी विभागाने शेतकऱयांकडे अधिक लक्ष देणे काळाची गरज आहे.
शेती हा पारंपरिक व्यवसाय असला तरी त्यात व्यावसायिक धोरण राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी सरकारनेही प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे. शेतकऱयांना शेतातील पिकांविषयी माहिती देऊन अत्याधुनिक शेतीकडे वळविणे आवश्यक आहे. बेळगाव तालुका असो किंवा शहर असो शेती आता कमी होताना दिसत आहे. कारण शहराचा आणि गावांचा विकास वाढत चालला आहे. यातच विभक्त कुटुंब पद्धतीमुळे शेतकऱयांच्या पदरात तुकडा शेती येत आहे. त्यामुळे शेतीकाम करून जीवन जगणे कठीण झाले आहे.
शेतकरी आता इतर व्यवसायांना अधिक महत्त्व देऊन शेतीला दुय्यम दर्जा देत आहे. कारण शेती करणे सध्याच्या परिस्थितीत परवडणारे नाही. कारण खर्च अधिक, उत्पादन कमी आणि मिळणारा दरदेखील कमी आहे. तुटपुंजी जमीन असल्यामुळे अनेक जण प्लॉट पाडून शेतीची विक्री करताना दिसत आहेत. मात्र, भविष्याच्यादृष्टीने ही धोक्मयाचीच घंटा असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये पावसाने चांगली साथ दिली असली तरी बऱयाचवेळा पूर येऊन शेतीचे नुकसान होत आहे. शेतामध्ये काम करण्यासाठी मजूरही मिळणे कठीण झाले आहे. कारण शेतामध्ये दिवसभर काम करून 150 किंवा 200 रुपये मजुरी दिली जाते. त्यापेक्षा इतर कामांना अधिक मजुरी असल्यामुळे मजुरांचा तुटवडाही भासत आहे. यासाठी अत्याधुनिक यंत्रांच्या साहाय्याने शेती करण्याची वेळ शेतकऱयांवर आली आहे. त्यादृष्टीने आता कृषी विभागानेही यामध्ये बदल करून शेतकऱयांना तारणाऱया पिकांवर भर देण्यास भाग पाडणे गरजेचे आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा
शेतकऱयांचा एकंदर व्यवसाय निसर्गावर अवलंबून आहे. पाऊस कसा पडेल याचा अंदाज कोणालाही अचूक देता येत नाही. यामुळे शेती हा एक नशिबाचा खेळ असल्याचे बोलले जाते. त्यात काही गैर नाही. दरम्यान, नैसर्गिक स्रोतांचा वापर करून पीक उत्पादनवाढ आणि त्याची गुणवत्ता सांभाळताना जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवणे महत्त्वाचे ठरते. त्यासाठी पूर्वनियोजन ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. शेतीतील खर्चाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. खतांचे वाढते दर, मजुरांची समस्या, रोग आणि किडीचा धोका, पावसाचा अनियमितपणा, अचानक होणारे हवामान बदल, बाजारभावातील असमतोल यामुळे शेतकऱयांवर भार पडतोय. यासाठी पारंपरिक पद्धतीने शेती करण्यापेक्षा सुधारित तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा आहे.
बेळगाव जिल्हय़ामध्ये आधुनिक यंत्रांचा वापर अजूनही म्हणावा तसा होताना दिसत नाही. बेळगाव तालुका तर यापासून खूप मागासलेला आहे. अजूनही पारंपरिक पिके आणि पारंपरिक पद्धतीनेच शेती करण्यावर बळीराजा भर देत असल्याचे पाहायला मिळते. यामुळे शेती परवडणे अशक्मय झाले आहे. यासाठी आता कृषी विभागाने खरीप हंगामाची तयारी करताना पूर्वनियोजन करणे महत्त्वाचे आहे.