400 शेतकऱयांचा समावेश
प्रतिनिधी / ओरोस:
खरीप हंगाम पीक विमा योजनेंतर्गत भातशेतीच्या झालेल्या नुकसानीपोटी 400 शेतकऱयांना 23 लाख 62 हजारांची नुकसान भरपाई विमा कंपनीकडून देण्यात आली आहे. यामध्ये केवळ 106.98 हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. दरम्यान, या योजनेत सहभागी झालेल्या सर्वच्या सर्व (3525) शेतकऱयांना नुकसान भरपाई देण्यात यावी. याकडे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी विमा कंपनीचे लक्ष वेधले आहे.
प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप हंगाम 2020 अंतर्गत पीकविमा घेण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले होते. ऐच्छिक स्वरुपाच्या या योजनेत 3525 बिगर कर्जदार शेतकरी सहभागी झाले होते. 589.25 हेक्टर क्षेत्रासाठी शेतकऱयांनी दोन कोटी 59 लाख रुपये विमा कंपनीला दिले होते. शासन हिश्यासह 21 कोटी 96 लाख रुपये कंपनीला देण्यात आले होते.
नुकसानीबाबतची माहिती ऑनलाईन पद्धतीने विमा कंपनीला तात्काळ देण्याची अट या योजनेत ठेवण्यात आली होती. त्यानुसार तात्काळ माहिती मिळालेल्या 400 शेतकऱयांना कंपनीने प्रति हेक्टरी सुमारे 23 हजार रुपये प्रमाणे 23 लाख 62 हजार रुपये नुकसानभरपाई दिली आहे.
2020 च्या खरीप हंगामात पर्जन्यमान चांगले झाल्याने भातशेतीचे पीकही चांगले झाले होते. 2700 रुपये प्रति क्विंटलप्रमाणे शेतकऱयाला हेक्टरी सुमारे एक लाख 20 हजारांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, भातकापणी काळात वादळीवाऱयासह झालेल्या पावसाने शेतकऱयांच्या हातातोंडाशी आलेला घास मातीमोल केला होता. त्यामुळे विमा योजनेत सहभागी सर्वच शेतकऱयांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.
सर्वच शेतकऱयांकडे मोबाईल अथवा ऑनलाईन माहिती बाबतची यंत्रणा उपलब्ध नाही. जिल्हय़ाच्या दुर्गम भागांचा विचार करता इंटरनेट सुविधाही उपलब्ध होत नाही. त्यामुळे एफ्को टोकियो या विमा कंपनीने सर्वच सहभागी शेतकऱयांना नुकसान भरपाई द्यावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱयांनी संबंधित विमा कंपनीला केली आहे.