दिवाळी साजरी करण्यासाठी शहरवासीय सज्ज, रात्री उशिरापर्यंत खरेदीचा उत्साह
प्रतिनिधी / बेळगाव
अनारोग्याची काजळी दूर करत आरोग्य संपन्न दिवाळी साजरी करण्यासाठी तमाम बेळगावकर सज्ज झाले आहेत. बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी झाली असून, दिवाळी हाती चार पैसे मिळवून देईल आणि लक्ष्मी खऱया अर्थाने प्रसन्न होईल असा विश्वास विपेत्यांना आहे. कोरोना अद्याप गेला नाही. तथापी त्याची धास्ती कमी झाली आहे. कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याने नागरिकही काही अंशी निर्धास्थ होत खरेदी करत आहेत.
मात्र कोरोना पूर्णपणे गेला नाही याचे भान असल्याने बाजारपेठेत मास्क वापरून खरेदी सुरू असल्याचे पहायला मिळाले. गुरुवारपासून प्रकाशाच्या पर्वाला प्रारंभ झाला. गुरुवारी गोवत्स पूजन झाले. आणि गल्लोगल्ली आकाश कंदील टांगले गेले. आकाशदिव्यांच्या स्निग्ध प्रकाशात परिसर उजळून निघत असून, सायंकाळी बाजारपेठेचे दृष्य मोठे मनोहारी दिसत आहे. शुक्रवारी सकाळी धन्वंतरी पूजन झाले. शनिवारी सकाळी लक्ष्मीपूजन होणार असून खरेदीसाठी बाजारपेठेत बऱयापैकी गर्दी झाली होती.
गणेशोत्सवामध्ये कोरोनाचे सावट गडद होते. त्यामुळे बऱयापैकी खबरदारी घ्यावी लागली. मात्र दिवाळीच्या दरम्यान हे सावट तुलनेने धुसर झाले. ग्रामीण व शहरी भागातील तसेच गोवा येथील नागरिक खरेदीसाठी बाजारपेठेत सकाळीच दाखल झाले. रात्री उशीरापर्यंत खरेदीचा उत्साह टिकून होता.
कोरोनाने निर्माण केलेली आर्थिक टंचाई आता दूर होईल. त्यामुळे व्यापारी, विपेत्यांनी रात्री उशीरापर्यंत दुकाने खुली ठेवली होती.
पर्यावरणपूरक आकाशकंदीलांना महत्त्व
आकाश कंदील, पणत्या, रांगोळी आणि रंग यांची खरेदी गेल्या आठवडय़ातच झाली आहे. पर्यावरणपूरक आकाशकंदीलांना यावषी महत्त्व प्राप्त झाले आहे. बांबू, वेत, कागद यांचा वापर करून आकाशकंदील तयार करण्यावर भर दिला असून चिनी आकाशकंदील यंदा मागे पडले आहेत. ग्राहकांनी त्याकडे पाठ फिरविली असून,
सर्वच दुकानांमध्ये भारतीय बनावटीचे व प्रामुख्याने पर्यावरणपूरक आकाशकंदीलांची खरेदी होत असल्याचे दिसून आले.
शनिवारी लक्ष्मीपूजन असल्याने प्रामुख्याने पूजा साहित्य, फळफळावळ, फुले, यांच्या खरेदीला अधिक प्राधान्य देण्यात आले. प्रथम लक्ष्मीपूजनाची तयारी महत्त्वाची. ती प्रसन्न झाल्यास पुढच्या खरेदीचा मार्ग सुकर होईल. हा विचार सर्वसामान्यांनी केला. त्यामुळे सजावट साहित्यापेक्षा पूजेसाठीच्या खरेदीवर नागरिकांनी भर दिला. त्यामध्ये पाच फळांचा संच, लक्ष्मीची पावले, वाती, फुल वाती, गेज वस्त्र, रांगोळीचे छाप, फुलांची तोरणे, ओम, समई, स्वस्तिक या शुभचिन्हांची प्रतिके यांची खरेदी प्रामुख्याने होत आहे. अर्थातच यंदा या साहित्याचे स्टॉल संख्येने अधिक आहेत. उदबत्ती, धूप, ऊद, कापूर यांचीही खरेदी सुरू आहे.
फुल बाजाराला बहर
फुल बाजाराला बहर आला असून, शेवंती, झेंडू, ऍस्टर या फुलांचा एक वार 80 ते 90 रुपयांना आहे. याशिवाय कमळ, गुलाब ही फुलेही खरेदी केली जात आहे. नरक चतुर्दशी दिवशी म्हणजेच शनिवारी सकाळी अभ्यंग स्नान होणार आहे त्यासाठी आवश्यक असा विधी म्हणजे कारिट फोडणे. त्यामुळे शुक्रवारी बाजारपेठेत कारीट्, त्याचा वेल, आंब्याची पाने, विडय़ाची पाने, केळीचे मोने यांची खरेदी प्राधान्याने झाली. याशिवाय बाजारपेठेत ऊस दाखल झाले असून, लक्ष्मीपूजनासाठी त्यांची खरेदी सुरू होती. अभ्यंगस्नानासाठी अनेक प्रकारची साबणे, उटणे, सुवासिक तेल यांचे स्टॉल सर्वत्र आहेत.
पूजेच्या निमित्ताने चिरमुरे, बत्तासे यांचे वाटप केले जाते. गतवषीच्या तुलनेत बत्तासे विक्रीचे स्टॉल अधिक असून, 20 रुपयाला एक पाकीट या दराने त्याची विक्री सुरू आहे. चिरमुऱयांच्या भट्टीमध्ये खरेदीसाठी झुंबड उडाली आहे.
लक्ष्मीपूजनाला खातेकिर्द वहय़ा महत्त्वाच्या मानल्या जातात. या वहीच्या पूजनाने नवीन वर्षाचा ताळेबंद मांडण्यास सुरूवात होते. त्यामुळे स्टेशनरी दुकानात वहय़ा खरेदीसाठी स्थानिक आणि परगावच्या नागरिकांची गर्दी उसळली. साधारण 350 ते 850 पर्यंत या वहय़ांचे दर आहेत. त्याचबरोबर लक्ष्मी पूजनासाठीचे पुस्तक, लक्ष्मीचे पान यांचीही खरेदी तेजीत झाली.
लक्ष्मीपूजनाला घरी आणि दुकानांमध्ये तसेच एकूण दिवाळीच्या निमित्ताने विद्युत रोषणाई केली जाते. गणेशोत्सवात या खरेदीला मर्यादा आल्या. मात्र दिवाळीने विद्युत साहित्य विकणाऱया दुकानदारांमध्ये आशावाद निर्माण केला आहे. यंदा दिवाळीचा सण गेल्या अनेक सणांच्या तुलनेत बरा जाईल अशी आशा विपेत्यांना आहे. विद्युत माळांची दिव्यांची खरेदी अधिक होत असल्याने हे विपेते समाधानी आहेत.
सजावट साहित्याचे स्टॉल
याशिवाय बाजारपेठेत सजावट साहित्याचे स्टॉल अधिक प्रमाणात दिसत आहेत. पडदे, गालिचे, उशा, मॅट्स, ज्याला जे शक्मय आहे ते साहित्य घेऊन यंदा विपेते चार पैसे मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या पाच सहा महिन्यात कोलमडलेले अंदाजपत्रक आता काही अंशी सुरळीत होण्यासाठी प्रत्येकाचा प्रयत्न सुरू आहे.
बाजारात कोहाळय़ांची आवक
दिवाळीमध्ये प्रामुख्याने लक्ष्मीपूजनादिवशी घर, दुकान आस्थापने व कार्यालये याठिकाणी कोहाळे बांधण्याची प्रथा आहे. त्यामुळे बाजारात कोहाळय़ांची आवक वाढली आहे. साधारण 80 ते 120 रुपयांपर्यंत कोहाळे उपलब्ध आहेत.
चौकट करणे विविध प्रकारच्या साहित्यांची विक्री
यंदा बाजारपेठेचे स्वरूप पूर्णतः बदलले आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन काळात अनेकांच्या हातचे काम गेले. त्यामुळे दिवाळीमध्ये अनेक जण विविध साहित्यांची विक्री करून चार पैसे मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. परिणामी महिला व लहान मुले आणि हातातून काम गेलेली अनेक मंडळी असंख्य प्रकारचे साहित्य घेऊन विक्री करत आहेत.
चौकट सामाजिक अंतराच्या नियमाचे उल्लंघन
दिवाळी हा वर्षातील मोठा सण असल्याने खरेदी आणि उत्साहाला उधाण येणार हे साहजिकच. मात्र कोरोनाचे प्रमाण कमी झाले असले तरी तो गेलेला नाही, याचे भान प्रत्येकाने ठेवणे आवश्यक आहे. मास्कबाबत खबरदारी घेण्यात येत आहे. परंतु सामाजिक अंतराच्या नियमाचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे.
दिवाळीचा उत्साह अधिक : विवेक नातू (विद्युत साहित्य विपेते)
गणेशोत्सवात कोरोनाचे संकट अधिक गडद होते. त्यामुळे विघ्नहर्त्याचा हा उत्सव मर्यादित स्वरूपात करावा लागला. त्या तुलनेत दिवाळीचा उत्साह अधिक आहे. माध्यमांमध्ये प्रामुख्याने वृत्तपत्रांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात असल्याचे वृत्त आल्याने सकारात्मकता वाढली आहे. खरेदी अभुतपूर्व नसली तरी समाधानकारक आहे, हे महत्वाचे.
पारंपरिक आकाशदिव्यांवर भर : श्रीधर गोकाक (विपेता)
यंदा आम्ही पारंपरिक आकाशदिव्यांवर भर दिला आहे. नागरिकांनी चिनी आकाशकंदिलांकडे पाठ फिरवुन आपला निषेधच नोंदविला आहे. आम्ही स्वत: गेल्या 15 महिन्यांपासून आकाश कंदील तयार करतो. वैविध्यपूर्ण नमुण्यांमुळे आमच्याकडील आकाशकंदीलांना विशेष मागणी आहे.
खबरदारी…
- बाजारपेठेतील गर्दीवर नियंत्रण हवे गर्दी होणे आरोग्यासाठी घातक
- मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे गरजेचे
- ज्येष्ठ नागरिकांनी बाजारपेठेत न जाणे श्रेयस्कर
- वाहतूक कोंडीमुळे नवीन समस्या उद्भवण्याची शक्मयता