गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी शहरातील मुख्य बाजारपेठेसह अनेक ठिकाणी गर्दी : पोलीस प्रशासनाचे प्रयत्न अयशस्वी
प्रतिनिधी /बेळगाव
सर्वांच्या लाडक्मया गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी लागणारे विविध प्रकारचे साहित्य खरेदी करण्यासाठी गुरुवारी नागरिकांनी एकच गर्दी केली. त्यामुळे सकाळपासूनच शहराच्या मुख्य बाजारपेठेसह शहापूर, टिळकवाडी, वडगाव आदी भागातील बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी झाली. एकीकडे कोरोनाचे संकट असताना दुसरीकडे बाप्पांच्या आगमनासाठीची तयारी पूर्ण करण्यात आली. मात्र संभाव्य तिसऱया लाटेचा धोका टाळण्यासाठी कोरोना नियमांचे पालन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. बेळगाव शहरातील मुख्यबाजारपेठेत गुरुवारी ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.
विविध प्रकारचे साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी झाल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास दिवसभर सहन करावा लागला. काही रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात गर्दी झाल्याने तब्बल 1 ते दीड तास वाहतूक खोळंबली. बाप्पांच्या स्वागतात कशाही प्रकारची कमतरता राहू नये, यासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात बाजारपेठेत नागरिक दाखल झाले होते.
शहरातील रविवार पेठ, गणपत गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजार, समादेवी गल्ली, रिसालदार गल्ली, काकतीवेस रोड, पाटील गल्ली, फोर्ट रोड आदी परिसरात गुरुवारी वाहतुकीची कोंडी झाली. यामुळे मोठय़ा उत्साहाने खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागला. सणासुदीच्या दिवसात वाहतुकीची कोंडी ही बेळगावकरांसाठी नेहमीचीच डोकेदुखी आहे. दररोजच शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये आणि मुख्य रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होत असते. आता तर गणेशोत्सव आल्याने खरेदीसाठी गर्दी झाल्याने वाहतूक खोळंबून राहत आहे. यामुळे वाहनचालक, पादचारी अक्षरशः वैतागले होते.
ग्रामीण भागातून नागरिकांनी
शहराचा वाढता पसारा आणि बाहेरून येणाऱया वाहनांची संख्या अधिक झाली आहे. रस्ते मात्र पूर्वीचेच राहिल्यामुळे जागोजागी वाहतुकीची कोंडी होताना दिसू लागली आहे. वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करत होते. कायमस्वरुपी ही समस्या सोडविण्यासाठी पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने संयुक्तपणे नियोजन करणे गरजेचे आहे. अन्यथा बेळगावकरांना या वाहतूक कोंडीच्या डोकेदुखीला कायमस्वरुपी तोंड द्यावे लागणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे काहींनी ऑनलाईन खरेदीवर भर दिला. तर ग्रामीण भागातून नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती.
होमगार्ड्स ठरताहेत असमर्थ
लॉकडाऊन आणि त्यानंतर विकेंड कर्फ्युमुळे ग्रामीण भागातील जनता शहराकडे फिरकली नव्हती. मात्र गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात गर्दी दिसून आली. परिणामी रहदारीवर याचा मोठा परिणाम झाला. त्यामुळे रहदारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने होमगार्ड्सना नियुक्त केले होते. मात्र होमगार्डस्ना वाहतुकीला शिस्त लावणे मुश्कील होत आहे. अनेकदा वाहनचालक त्यांच्यावरच दादागिरी करून पुढे जाताना दिसत आहेत. गणेशोत्सवात शहरात गर्दी होते, याची पूर्वकल्पना असूनही शहरातील मुख्य रस्त्यांवरील चौकांमध्ये व बाजारपेठेत होमगार्ड्सची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या होमगार्ड्सना कोणच दाद देत नसल्याने वाहतुकीची कोंडी आणखी वाढत आहे. यामुळे गुरुवारी शहरातील विविध भागांत मोठय़ा प्रमाणात गर्दी दिसून आली.