शहर, उपनगरांमधील बाजारपेठेत नागरिकांची झुंबड
प्रतिनिधी / बेळगाव
एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे मात्र खरेदीसाठी मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती. यामुळे कोरोना नियमावलीचा नागरिकांनी फज्जा उडविल्याचे दिसून आले. प्रशासनाने खरेदीसाठी वेळ दिला असला तरी एकाच ठिकाणी गर्दी करून कोरोनाचा संसर्ग वाढविण्याचे प्रकार घडत असल्याने यावर नियंत्रण कोणाचे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दुसऱया टप्प्यातील लॉकडाऊनला सोमवारपासून सुरूवात झाली. सकाळी 6 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीला मुभा देण्यात आली आहे. परंतु या काळात गर्दीचा महापूर लोटताना दिसत आहे. केवळ पाच- दहा रुपयांच्या भाजीसाठी जीव धोक्मयात घालणे कितपत योग्य आहे. असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नागरिकांना कोरोनाचे गांभीर्यच उरलेले नसल्याचे दिसत आहे.
गर्दी ठरतेय ‘कोरोना स्पेडर’
शहर तसेच उपनगरांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडत आहे. एकाचवेळी मोठय़ा प्रमाणात गर्दी होत असल्याने कोरोनाचे संक्रमण वाढण्यासाठी ही गर्दी कारणीभूत ठरत आहे. लॉकडाऊन सुरू झाला त्यावेळी पोलिसांच्या धाकाने गर्दी थोडीशी कमी होती. परंतु सोमवारपासून मात्र गर्दीत वाढ होत आहे. शहर तसेच उपनगरांतील प्रत्येक बाजारपेठेत गर्दी होत असल्याने ही चिंतेची बाब ठरत आहे.
पोलिसांनी कारवाई करण्याची गरज शनिवार व रविवारी विकेंड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली होती. परंतु सोमवारपासून मात्र कारवाईत ढिलाई झाल्याने नागरिक पुन्हा एकदा रस्त्यावर उतरू लागले आहेत. केवळ 10 पर्यंतच नाही तर त्यानंतरही राजरोसपणे नागरिकांचा मुक्त संचार सुरू आहे. यामुळे पोलिसांनी कारवाई केली तरच पुन्हा एकदा अशा लोकांवर नियंत्रण आणता येईल, अशा प्रतिक्रियाही व्यक्त करण्यात येत आहेत.