म्हापसा प्रतिनिधी :
शब्दांचा खेळ करून भाजपचे नेते जनतेची दिशाभूल करत आहेत, त्यांचप्रमाणे रवी नाईक पुत्रांच्या भाजप प्रवेशावरून स्व. मनोहर पर्रीकर यांना खोटे ठरवण्याचा प्रयत्न सध्याच्या भाजप नेत्रुत्वाकडून होत असल्याचा गंभीर आरोप थिवीचे माजी आमदार तथा फलोत्पादन मंत्री किरण कांदोळकर यांनी केला आहे. आता यात खरे फिटिंग कोण, मनोहर पर्रीकर कि आताचे प्रदेशध्यक्ष सदानंद तानवडे याचे उत्तर सरकारने द्यावे असा पलटवार श्री. कांदोळकर यांनी भाजपा सरकार वर केला.
काणका-येथील आपल्या निवासस्थानी शनिवारी संध्याकाळी घेतलेल्या एका विशेष पत्रकार परिषदेत कांदोळकर बोलत होते.
कॉग्रेसचे नेत रवी नाईक यांचे पुत्र असलेल्या रॉय नाईक तसेच रितेश नाईक यांचा नुकताच भाजपप्रवेश घडवून आणल्याबद्दल पक्षाचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्यावर आरोप करतांनाच 2007 ते 2012 च्या दरम्यान, तत्कालीन ग्रुहमंत्री असलेल्या रवी नाईक यांच्या पुत्रांवरुन मनोहर पर्रिकर यांच्या नेत्रुत्वाखाली तीव्र आंदोलन भाजपकडून छेडण्यात आले होते इतकेच नव्हे तर विधानसभा सतत तीन वेळा बरखास्त करण्याचा प्रसंग त्यावेळी ओढवला होता, यागोष्टीची कांदोळकर यांनी आठवण करून दिली. दरम्यान, रॉय नाईक यांच्या पक्षप्रवेशावरुन पत्रकारांनी पक्षाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांना छेडले असतां, शब्दांचा खेळ करीत त्यावेळचा रॉय नाईक तत्कालीन ग्रुहमंत्र्यांचा पुत्र होता तर आताचा भाजप प्रवेश करणारा रॉय नाईक वेगळा असल्याची मुक्ताफळे उडवून भाजपचे पितळ जनतेसमोर उघड केल्याचा आरोप कांदोळकर यांनी यावेळी केला. दरम्यान, कॉग्रेसचे नेते तथा तत्कालीन ग्रुहमंत्री असलेल्या रवी नाईक यांचे पुत्र असलेल्या रॉय नाईक यांचे ड्रग्ज माफियांशी लागेबांधे असल्याच्या गंभीर आरोपावरून मिकी पाशेको, लवु मामलेदार तसेच मायकल लोबो आणी स्व. विष्णु वाघ यांनी रॉय नाईक यांच्या विरोधात तयार केलेला अहवाल नेमका कुठल्या रॉय नाईक संबंधात होता हे जनतेसमोर स्पष्ट करण्याचे आवाहन किरण कांदोळकर यांनी पक्षाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांना केले
. दरम्यान, या विषयांवरुन पक्षाचे नेते स्व. मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वाखाली रॉय नाईक यांच्या विरोधात उभारण्यात आलेले आंदोलन नेमके कशासाठी होते या प्रश्नाचे खरेखुरे उत्तर , पक्षाचे त्यावेळचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मंत्री दिलीप परूळेकर, दयानंद मांदेकर, महादेव नाईक, रमेश तवडकर, मिलींद नाईक, त्यांचप्रमाणे दामु नाईक, राजन पाटणेकर, दयानंद सोपटे, आदींना नुकताच भाजप प्रवेश केलेल्या रॉय रवी नाईक यांच्या बाबतीत जनतेसमोर सत्य आणाण्याचा आग्रह कांदोळकर यांनी यावेळी धरला. अन्यथा राज्यातील जनता भाजपच्या खोटारडेपणाला कदापी माफ करणार नसल्याचे शेवटी कांदोळकर यांनी सांगितले.