ऑनलाईन टीम / नवी मुंबई
परीक्षा कोणती ही असली तरी परीक्षार्थींसाठी ती केवळ परीक्षा नसते तर आयुष्याला वळण देणारा मार्ग असतो. म्हणुनच एखाद्या परीक्षेचा पेपर होण्याआधीच दलालांच्या हाती पडल्यानंतर यातुन व्यवहार होतो. आणि दर ठरतात. हे दर फक्त एखाद्या विषयापुरते मर्यादीत न राहता. हे दर ठरतात कष्टाने वर्षेभर मेहनत करणाऱ्या परीक्षार्थींच्या आयुष्याचे आणि सौदेबाजी होते, परीक्षार्थींच्या भविष्याची. पेपर फुटीसाठी कार्यरत असणारं रॅकेट मुलांचं आयुष्य उद्धवस्थ करणारं असतं. असं असलं तरी पेपर फुटीचा हा प्रकार आज ही सुरुच असल्याचा प्रत्यय मुंबई येथे बारावीच्या परीक्षेत आला आहे.
मुंबईत बारावी बोर्डाचा पेपर फुटल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबईतील महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर फुटल्याची बातमी समोर आली आहे. तर काही विद्यार्थ्यांच्या फोनमध्ये ही प्रश्नपत्रिका आढळली असून ते परीक्षा केंद्रावर उशिरा पोहोचले होते. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी मालाड येथील एका खासगी कोचिंग क्लासच्या शिक्षकाला अटक केली आहे.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, मालाड भागात एका परीक्षा केंद्रावर पेपर फुटला. आज रसायनशास्त्राचा पेपर होता आणि काही विद्यार्थी परीक्षा केंद्रावर उशिरा पोहोचले. तपासणी केली असता या मुलांच्या फोनमध्ये आज होणाऱ्या रसायनशात्राचा पेपर आढळला. या पेपरफुटीच्या प्रकरणात एका खासगी कोचिंग क्लासच्या शिक्षकाचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना असून त्या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. परीक्षेच्या आधी या शिक्षकाने प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रूपवर पाठवली होती. याबाबत बोलताना विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेचे फोटो अनेक अॅप्सवर व्हायरल झाल्याचा आरोप केला आहे.