प्रतिनिधी / सांगरूळ
खाटांगळे ता . करवीर येथे अशा स्वयंसेवीका मारहाण प्रकरणी ग्रामपंचायत सदस्या महिलेसह तिघांना करवीर पोलिसांनी गुरुवारी अटक केली. वैशाली कृष्णात पाटील (वय ४५ ) कृष्णात बापू पाटील (वय ५० ) पंडित बापू पाटील ( ५३ ) राहणार खाटांगळे अशी त्यांची नावे आहेत. तर एकनाथ ज्ञानू पाटील सध्या फरार आहे. करवीरचे पोलीस पथक त्याचा शोध घेत आहे.
सांगरुळ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कार्यरत असलेली खाटांगळे तालुका करवीर येथील आशा स्वयंसेविका शोभा तळेकर वय ४२ यांना रविवारी ग्रामपंचायत सदस्या वैशाली कृष्णात पाटील सह चौघांनी मारहाण केल्याची फिर्याद करवीर पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली होती.
कोरोना विषाणूच्या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी गावोगावी सर्वेक्षणाचे काम आशा स्वयंसेविका करत आहेत. आयुष मंत्रालयाकडून वाटप करण्यात येत असलेल्या आर्सेनिक अलबम या होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप शोभा तळेकर करत होत्या. त्या ग्रामपंचायत सदस्य वैशाली पाटील यांच्या घरी आल्या असता त्यांच्याकडे पाटील यांनी जादा गोळ्यांची मागणी करत ज्यादा गोळ्या दिल्या नाहीत म्हणून त्यांना चौघांनी मारहाण केली होती .याबाबत शोभा तळेकर यांनी करवीर पोलीस स्टेशनमध्ये चौघा विरोधात दाखल केली होती .करवीर तालुक्यातील अशा स्वयंसेविकानी निदर्शने करत काम बंद आंदोलन सुरू केले होते .करवीर चे गटविकास अधिकारी सचिन घाडगे यांनी मारहाण करणार यांच्यावर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर संघटनेने आंदोलन स्थगित करून काम सुरू ठेवले होते .तसेच दोषींवर कारवाई करण्यासाठी संघटनेचा सतत पाठपुरावा सुरू होता.
अशा व गटप्रवर्तक संघटनेने याबाबत जोरदार शक्तिप्रदर्शन करत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्याकडे आशा स्वयंसेविका वर होणाऱ्या अन्यायाबाबत दाद मागितली होती . आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या संघटनेने निवेदन देऊन अशा स्वयंसेविकावर संसर्गाच्या काळात सर्वेक्षण करताना अनेेक अडचणी येत आहेत . संबंधित कर्मचाऱ्यांवर गावातील सर्वेक्षणाची जबाबदारी आहे स्थानिक लोकांची तसेच बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या लोकांची माहिती संकलित केली जात आहे .तसेच गरजेनुसार संस्थेत तसेच घरच्या घरी विलगीकरण करून आरोग्य सेवा दिल्या जात आहेत . हे सर्व करत असताना अशा स्वयंसेवीकेना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यांना अनेक ठिकाणी शिवीगाळ केली आहे मारहाण केली तसेच अपमानास्पद वागणूक मिळत आहे असा काही प्रकार घडल्यास त्यांना तक्रार देण्याच्या सूचनाही केल्या आहेत .अशा सेविका तसेच कार्यकर्ते यांच्यावर होणारे अन्याय विरोधात तक्रारी देणार सांगितले असले तरी त्यांच्यावर दबाव आहे . त्यामुळे तक्रार देण्याचे धाडस करत नाहीत .त्यातून तक्रार द्यायचा प्रयत्न झाल्यास तक्रार घेण्यास टाळाटाळ केली जाते .यामध्ये आपण स्वतः लक्ष घालून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना न्याय द्यावा अशी मागणी केली होती.
याची दखल घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमान मित्तल यांनी आशा स्वयंसेविका मारहाण प्रकरणी योग्य ते आदेश देऊन केलेल्या कार्यवाहीची माहिती देण्याची विनंती जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर अभिनव देशमुख यांच्याकडे केली होती.
जिल्हा प्रशासनाने या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घातल्याने तसेच अशा व गटप्रवर्तक संघटनेच्या पाठपुराव्यामुळे करवीर पोलिसांनी गुरुवारी रात्रीतीन आरोपींना अटक केली आहे.