गृहिणींचे किचन बजेट कोलमडले
वार्ताहर / देवराष्टे
स्वयंपाकात खाद्यतेल आवश्यकच आहे. खाद्यतेलाशिवाय स्वयंपाक अपूर्ण आहे. साधारणपणे दसरा दिवाळीच्या दिवसात खाद्यतेलाचे भाव वाढतात .यावर्षीही ते वाढले परंतु त्यानंतरही ते अद्याप वाढतच आहेत. खाद्यतेलाच्या या वाढलेल्या प्रचंड भाववाढीने सामान्य कुटूंबे बेजार झाली असुन गृहिणींचे किचन बजेट कोलमडले आहे.
सर्वत्र कोरोनामूऴे जन सामान्यांच्या मिळगतीला खीळ बसली असताना दूसरीकडे महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल डिझेलपासुन ते खाद्यपदार्थापर्यंत सर्वच वस्तूचे दर वाढले आहेत. एकीकडे कोरोना संर्सगाच्या वाढत्या प्रभावाने राज्य सरकारने कडक लॉकडाऊन केला आहे. त्यामुळे ऊद्योग व्यवसायाची चाके थांबली आहेत. तर अनेकांचा रोजगार बुडाला आहे.
एक डिसेंबरपासुन गॅसच्या दरातही तब्बल 100 ते 125 रुपयांची भाववाढ झाली आहे.त्यामुळे ग्रामीण भागात आता आपली चुलच बरी म्हणण्याची वेळ आली आहे. अनेक कुटूंबे चहापुरताच गॅसचा वापर करत आहेत. अवकाळीने सोयाबीन, भुईमूग यासह अन्य तेलबिया पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे या मालाची बाजारातील आवकही कमी झाली आहे. याचा परिणाम खाद्यतेलाच्या दरावर झाला आहे. केंद्र सरकारने खाद्यतेल आयात केले तरच या दरावर नियंत्रण आणता येऊ शकते. अन्यथा खाद्यतेलाचे दर चढेच राहणार आहेत.
खाद्यतेलाचे भाव
सुर्यफुल एक लि. दिवाळीपुर्वी 110 रु.
सध्या 140 ते 150 रु.
पामतेल एक लिं दिवाळीपुर्वी 85 रु.
सध्या 130 ते 135 रु.
शेंगदाणा एक लि. दिवाळीपुर्वी 100 रु.
सध्या 170 ते 180 रु.