पोलिसांकडून लॉकडाऊनची अंमलबजावणी, ग्रामीण भागातील नागरिकांची झाली वर्दळ कमी
वार्ताहर / खानापूर
शनिवारी व रविवारी दोन दिवस विकेंड कर्फ्यूच्या नावे मिनी लॉकडाऊन होणार असल्याचे संकेत निर्माण झाल्याने खानापूर तालुक्मयातही पोलिसांनी शुक्रवारी दिवसभर खानापूर शहरातील गर्दीवर नियंत्रण आणले. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद पाडण्यास पोलिसांनी भाग पाडले. त्यामुळे खानापूर शहरात बारापर्यंत झालेली खेडय़ापाडय़ातील नागरिकांची गर्दी पूर्णतः ओसरली. दुपारनंतर खानापूर शहराच्या बाजारपेठेत तुरळक गर्दी दिसून येत होती. खानापूर शहरातील बाजारपेठेत 50 टक्क्याहून अधिक दुकाने बंद असल्याचे चित्र निर्माण झाले. एकूणच विकेंड कर्फ्यूच्या पूर्वसंध्येला पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनीही आता शहराकडे हळुवारपणे येण्याची पाठ फिरवली आहे.
खानापुरात जाऊन पोलिसांचा मार कोण खाणार, अशी धास्ती खेडय़ापाडय़ातील लोकांमध्ये निर्माण झाल्याने आता विकेंड कर्फ्यूचा दोन दिवस मात्र खानापूर शहरात शुकशुकाट बसणार, अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. शनिवारी व रविवारी दोन दिवस पूर्णतः व्यवसायाला चपराक बसणार आहे. सकाळी 6 ते सकाळी 10 पर्यंत थोडय़ाफार प्रमाणात व्यापाराला मुभा देण्याची शक्मयता आहे. परंतु सकाळच्या प्रहरी खेडय़ापाडय़ातील लोक बाजारपेठेत येतील का, व आपला व्यवसाय होईल का, याची चिंता शहरातील व्यापाऱयांना लागली आहे. त्यामुळे शनिवारी व रविवारी हे दोन दिवस पूर्णतः लॉकडाऊनमध्येच जाणार का, असा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये पडला आहे. शहरामध्ये होणारी वाढती गर्दी लक्षात घेता शहरातील भाजी मार्केट तालुका क्रीडांगणाच्या मोकळय़ा ठिकाणी उभारण्यासाठी नगरपंचायतीने दोन दिवसापूर्वीच निर्णय घेतला आहे. या ठिकाणी अनेक भाजीविपेत्यांनी आपली दुकानेही मांडली आहेत. पण विकेंडमुळे रविवारच्या बाजारपेठेवर याचा काय परिणाम होणार हे सांगणे कठीण आहे.
एखादेवेळी भाजीपाला भरला तर खेडय़ापाडय़ातील ग्राहक शहराकडे फिरतील का, असा प्रश्नही या भाजीविक्रेत्यांकडे निर्माण झाला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस व्यापाऱयांसाठी फायदेशीर ठरणार हे सांगणे कठीण आहे. येत्या दि. 4 मे पर्यंत जमावबंदीचा आदेश सरकारने दिला आहे. कोरोनाची वाढती संस्कृती लक्षात घेता खबरदारी म्हणून सरकारने या जमावबंदीच्या नावे मिनी लॉकडाऊनच हाती घेतल्यामुळे आता शहरातील गर्दीवरही नियंत्रण येणार आहे. पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमा होऊ नये, असे या जमावबंदीचा कायदा असल्याने शहरातील बाजारपेठेवर नागरिकांची गर्दी नक्कीच कमी असणार यात शंका नाही.
आगामी आठवडय़ाभरात अनेकांच्या दारात शुभमंगल वाजणार आहे. परंतु कोरोना संक्रमणाच्या संकट काळामध्ये हे कार्यक्रम तसे काय निभावणार येणाऱ्या अडचणी विवाह समारंभासाठी येणारे पाहुणे त्यापैकी पाहुण्यांना येण्या-जाण्यासाठी होणारी गैरसोय पाहता विवाह समारंभ करावेत, की नाही असाही प्रश्न अनेकांच्या समोर निर्माण झाला आहे. तर अनेक आणि विवाह समारंभ पुढे ढकलण्याचा निश्चयही घेतला आहे. मागील वषी देखील पूर्णतः लॉकडाऊनमुळे सर्व कार्यक्रम पुढे ढकलले यावषीदेखील अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने मोठा पेच पडला आहे.
व्यापारी वर्गाने देखील यावषी आपला व्यवसाय चांगला होईल या भावनेने कोटय़वधीचा माल आपल्या दुकानांमध्ये भरला आहे. एप्रिल, मे महिन्यामध्ये मोठय़ा प्रमाणात विवाह सोहळे होतात. कापड दुकानदाराने तर आपला व्यवसाय यावषी चांगला करण्यासाठी मोठय़ा प्रमाणामध्ये खरेदी केली आहे. परंतु कोरोनाच्या संक्रमण परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या अडचणी पाहता आपला व्यवसाय कसा होणार याची चिंता कापड व्यावसायिकांना लागली आहे. त्यामुळे कापड दुकाने चालू ठेवावित, अशी मागणी त्यांनी धरली आहेत. तर दुसरीकडे हॉटेल व्यावसायिकांना केवळ पार्सलची मुभा देण्यात आली आहे. बेकरी व्यवसायाला तर कच्चा माल असल्याने आपल्याला नुकसान होणार म्हणून बेकरी व्यवसाय सुरू करण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे शुक्रवारी दिवसभरात अनेक बेकरीची दुकाने सुरू करण्यास मुभा देण्यात आली. परंतु अन्य दुकाने मात्र बंद करण्यात आली होती. एकूणच खानापूर बाजारपेठेत शुक्रवारी मिनी लॉकडाऊनचा प्रकार दिसून आला. पोलिसांनीही जमावबंदीचा कायदा हाती घेतला असून कायद्याची अंमलबजावणी करत असून हे जनतेच्या हितावह आहे. यासाठी जनतेने सहकार्य करावे, विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.
लग्नसमारंभास 50 जणांचीच उपस्थिती बंधनकारक
खानापूर शहर बाजारपेठेत दर रविवारी मोठय़ा प्रमाणात बाजार भरतो. सध्या लग्नाचे मुहूर्तही उंबरठय़ावर आहेत. त्यामुळे बाजारपेठेत लग्नाचा जथ्या खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी असते. लग्नासाठी लागणारे कपडे, लग्नासाठी लागणारे जीवनोपयोगी साहित्य व इतर साहित्य खरेदीसाठी आता लोकांनाही त्रासदायक ठरणार आहेत. एकीकडे सरकारने लग्न समारंभासाठी केवळ 50 जणांची उपस्थिती असणे बंधनकारक ठेवून त्यांना पास देण्याची मुभा ठेवली आहे. एखाद्या लग्न समारंभात प्रमाणापेक्षा जास्त लोकांची संख्या उपस्थित राहिल्यास त्या आयोजकांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचेही संकेत प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे विवाह समारंभ करणाऱयांमध्येही मोठा पेच निर्माण झाला आहे. तरीदेखील गेले दोन दिवस खानापूर तहसीलदार कार्यालयात लग्नासाठी परवाना मिळविण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड झाली आहे. गुरुवारी दिवसभर शंभरहून अधिक जणांना परवाना देण्यात आला होता. शुक्रवारी देखील जवळपास 150 हून अधिक जणांनी परवान्यासाठी अर्ज मागितले आहेत.