खानापूर / वार्ताहर
खानापूर तालुक्मयात नुकताच झालेल्या ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत निवडून आलेल्या तालुक्मयातील 51 ग्राम पंचायतींच्या सदस्याचा सत्कार तालुका म. ए. समितीच्यावतीने करण्यात आला. येथील शुंभम गार्डनमध्ये आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म. ए. समितीचे अध्यक्ष देवाप्पा गुरव होते.
खानापूर तालुक्मयात गेल्या 22 डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत 51 ग्रामपंचायतीमधून 623 सदस्यांची निवड झाली आहे. या नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्यांचा खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने श्रीफळ, शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शुंभम गार्डनमध्ये संपूर्ण वातावरण भगव्या मय झाले होते.
यावेळी माजी आमदार अरविंद पाटील यांनी तालुक्मयातील नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्काराबद्दल शुभेच्छा देऊन आगामी पाच वर्षाच्या काळात प्रत्येक ग्रामपंचायत सदस्याने गावातील विकास साधावा, राजकारणाला बळी न पडता ग्रामीण विकास साधण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील रहावे, गटातटाचे राजकारण बाजूला ठेवून गावाचा विकास साधवा, असे आवाहन केले. यावेळी सत्कार कार्यक्रमाला तालुक्मयातील जवळपास 500 हून अधिक ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर समितीचे सूर्याजी पाटील मारुती परमेकर गोपाळ देसाई संभाजीराव देसाई कृष्णकांत बिरजे पी. एच. पाटील, सभापती नंदा कोडचवाडकर, ता. प. सदस्य पांडुरंग सावंत, सामाजिक कार्यकर्ते निरंजन सरदेसाई, अनेक नेते मंडळी, तालुका पंचायत सदस्य, जिल्हा पंचायत सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमात त्यांचे स्वागत पिराजी कुऱहाडे यांनी तर आभार ए. बा.r मुरगोड यांनी मानले. या सत्कार कार्यक्रमाला बहुसंख्य समिती कार्यकर्ते व संघ-संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.