कणकुंबी / वार्ताहर
दरवर्षी 5 सप्टेंबरला होणारा शिक्षक दिन कार्यक्रम यावर्षी कोरोना महामारीमुळे रद्द करण्यात आला होता. परंतु सेवानिवृत्त शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या गौरवार्थ कोविड नियमांचे पालन करून सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार तसेच कोरोना संक्रमणामुळे बळी गेलेल्या कुटुंबीयांचा गौरव, दहावी परीक्षेत विशेष श्रेणीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप वितरण आणि सरकारच्या एनएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव असा संयुक्त कार्यक्रम खानापूर येथील पाटील गार्डन सभागृहात संपन्न झाला.
खानापूर तालुका क्षेत्रशिक्षणाधिकारी कार्यालय आणि क्षेत्र संपन्मूल कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका पंचायत अध्यक्षा नंदा कोडचवाडकर होत्या. प्रारंभी दीपप्रज्वलन आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन प्रतिमेचे पूजन विविध मान्यवरांच्या हस्ते पार पडले. दरवर्षी 5 सप्टेंबर या शिक्षक दिनाच्या निमित्ताने तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांत सेवा बजावलेल्या निवृत्त शिक्षकांचा सत्कार, अध्यक्ष व शिक्षकांचा सत्कार आणि विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव असा कार्यक्रम पार पडतो. परंतु यावर्षी मार्चपासून ते अद्याप कोरोना महामारीमुळे सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले. मात्र शिक्षकी पेशात सेवा बजावून निवृत्त होणाऱया शिक्षकांचे कार्य लक्षात घेऊन त्यांच्या कार्याला उत्तेजन देण्याच्या उद्देशाने क्षेत्र शिक्षणाधिकारी लक्ष्मण यकुंडी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. कोविडच्या नियमानुसार झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून खानापूरच्या तहसीलदार रेश्मा तालिकोटी होत्या.
त्या म्हणाल्या पुढे म्हणाल्या, शिक्षकी पेशा हा सर्वात पवित्र आणि शुद्ध पेशा आहे. सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार करणे हे शासनाचे कर्तव्य आहे. कोरोना महामारी काळात बळी गेलेल्या शिक्षकांच्या कुटुंबीयांचा गौरव अभिमानास्पद आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक क्षेत्र शिक्षणाधिकारी लक्ष्मण यकुंडी यांनी करून स्वागत केले. यावेळी दहावी परीक्षेत सरकारी विद्यालयातून विशेष श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शासनाच्यावतीने लॅपटॉप वितरण करण्यात आले. माध्यमिक स्तरावर घेण्यात आलेल्या एनएमएमएस या शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यातून 16 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. या विद्यार्थ्यांना दरमहा 1 हजार रु. प्रमाणे चार वर्षे त्यांच्या शिक्षणाच्या खर्चासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. या सर्व विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी जि. पं. सदस्य जितेंद्र मादार, तहसीलदार रेश्मा तालिकोटी व मान्यवरांनी शिक्षकांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. व्यासपीठावर जि. पं. सदस्य सुरेश मॅगेरी, शिक्षणाधिकारी कार्यालयातील व्यवस्थापक प्रकाश होसमणी, तालुका दैहिक शिक्षणाधिकारी एल. एन. कुरेर, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष व्ही. बी. होसूर, पी. आर. पत्री, सरकारी संघाचे अध्यक्ष आय. एम. होन्ननावर, प्राथमिक शाळा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन चवळगी, एनजीओ संघाचे अध्यक्ष बसवराज यळ्ळूर तसेच विविध संघांचे प्रतिनिधी, बीआरसी, सीआरपी, विविध शाळांचे मुख्याध्यापक आणि पालकवर्ग उपस्थित होते. क्षेत्र संपन्मूल अधिकारी आप्पाण्णा अंबगी यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीआरसी राजकुमार कुंभार आणि एम. एम. वाली यांनी केले.
क्षेत्र शिक्षणाधिकारी लक्ष्मण यकुंडी यांचे विशेष कौतुक
खानापूर तालुक्यामध्ये अद्याप शिक्षक भवन इमारत नाही. त्यासाठी शिक्षणाधिकारी या नात्याने लक्ष्मण यकुंडी यांनी विशेष प्रयत्न चालविले आहेत. हे काम आम्ही जिल्हा पंचायतीचे तालुक्यातील सदस्य या नात्याने पूर्ण करणार याची ग्वाही देऊन यकुंडी यांच्या कार्याचा त्यांनी गौरव केला. कोविड महामारी काळात तालुक्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी शिक्षकांच्या माध्यमातून नवनवीन संकल्पना राबवून तालुक्याचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी क्षेत्र शिक्षणाधिकारी यकुंडी यांनी विशेष परिश्ा़खम घेतले आहेत. तालुक्याला कडक शिस्तीचे कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून लक्ष्मण यकुंडी यांच्याबद्दल प्रशंसोद्गार काढून जिल्हा पंचायत सदस्य जितेंद्र मादार यांनी त्यांचे कौतुक केले.