खानापूर / वार्ताहर
खानापूर तालुक्मयात कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव अनेक गावांमध्ये वाढतच आहे. अनेक गावांमध्ये रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाने धास्ती घेतली आहे. तालुक्मयात गेल्या पंधरा दिवसात ज्या गावात संक्रमणाचा आकडा वाढला आहे. अशा 9 गावांना मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून जिल्हाधिकाऱयांनी जाहीर केले आहे. मंगळवारी सायंकाळी हा आदेश जारी केला असून मंगळवारी रात्रीपासून सदर 9 गावे सिलडाऊन करून गावातील लोकांना जीवनावश्यक सुविधा पुरवण्याचे आदेश बजावले आहेत.
तालुक्मयातील सदर 9 गावांमध्ये रुमेवाडी, हलकर्णी, नंदगड, लोंढा, अशोकनगर, आंबेवाडी, शिरोली, जामगाव, देवलती या गावांचा समावेश आहे. जिल्हाधिकाऱयांच्या आदेशानुसार पुढील आदेश येईपर्यंत संबंधित गावातील लोकांनी गावाबाहेर जाऊ नये व बाहेरगावच्या लोकांनी गावात येऊ नये, असे आदेश बजावले आहेत. येथील नागरिकांच्या दैनंदिन गरजा पुरविण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर एक नियंत्रण कमिटीची स्थापना करून त्या लोकांना जीवनोपयोगी वस्त पुरविण्यासाठी नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. याकरिता ग्रामपंचायतीचे विकास अधिकारी व त्यांच्या कर्मचारी वर्ग, तलाठी, ग्राम साहाय्यक, बिट पोलीस, अंगणवाडी शिक्षिका, आशा कार्यकर्त्या यांनी समन्वय साधून संबंधित गावातील परिस्थितीची हाताळणी करण्याचे आदेश बजावले आहेत.
जिल्हाधिकाऱयांच्या या आदेशानुसार सदर नियंत्रण समितीने संबंधित गावांमध्ये घरोघरी जाऊन रुग्णांची संख्या व कोरोना टेस्ट संदर्भात जागृती करून संबंधितांची टेस्ट घेण्याचेही आदेश बजावले आहेत. गावामध्ये किती लोक आजारी आहेत, किती लोकांना कोरोनाची बाधा आहे, अशांचा अहवाल तयार करणे, गावातील कोरोना टेस्ट झाल्यानंतर किती लोक होमक्वारंटाईन व किती आयसोलेशनमध्ये दाखल करण्यात आले आहेत. अशा लोकांची यादी तयार करून प्रत्येक नागरिकांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी ग्रामपंचायत पातळीवरील नियंत्रण कमिटीने करून अहवाल देण्याचा आदेश जिल्हाधिकाऱयांनी बजावला असून या संदर्भात कोणीही निष्काळजीपणा अथवा सहकार्य करण्यास समर्थन न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे सूचित करण्यात आले आहे.
खानापूर तालुक्मयातील अनेक गावात रुग्णांचा वाढता धोका
खानापूर तालुक्मयात प्राथमिक टप्प्यामध्ये सदर 9 गावांचा अहवाल जिल्हाधिकाऱयांकडे पोहोचला असून या गावांमध्ये कोरोना बाधितांची संख्या व आजारपणाची लक्षणे अधिक असल्याने या गावांना मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केले आहे. अशाप्रकारे खानापूर तालुक्मयातील अनेक गावातील लेक सर्दी, खोकला, ताप अशा आजाराने लोक झोपले आहेत. स्थानिक डॉक्टरांच्या सल्ल्यावरून अनेक जण उपचार घेत आहेत. परंतु सदर गावातील लोक टेस्ट करून त्यावर वेळीच उपचार घेण्यासाठी मागे पाहात आहेत. त्यामुळे अनेक गावात वाढता धोका निर्माण झाला आहे. यासाठी आता प्रत्येक गावाने सतर्कता राखणे नितांत गरजेचे बनले आहे. मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे या गोष्टीना अनेक खेडय़ातील लोक फाटा देत आहेत. पण याचा गंभीर परिणाम नजीकच्या काळात भोगावा लागणार नाही यासाठी प्रत्येकाने सतर्क राहून आपलेही गाव अशा गंभीर परिस्थितीत येणार नाही याची काळजी आता तालुक्मयातील जनतेने घेणे गरजेचे आहे. तालुक्मयात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मरणाचा आकडाही वाढत आहे. पण अनेकांमध्ये गांभीर्य नसल्याने धोका निर्माण झाला आहे. यासाठी आजारपणाची लक्षणे दिसून आल्यास जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
ा. सध्या कार्यरत असलेले योगेश्वर एस. यांची बदली हावेरी जिल्हय़ामध्ये झाली आहे.
निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार दोन वर्षांपासून कार्यरत असलेल्या अधिकाऱयांची बदली केली जाते. त्यानुसार जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांचीही बदली करण्यात आली होती. त्याचबरोबर अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांचीही बदली करण्यात आली होती. मात्र आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची आणि अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे.