कर्नाटक राज्य रयत संघातर्फे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
खानापूर तालुक्यामध्ये मोठय़ा प्रमाणात बेकायदेशीर वाळूउपसा सुरू आहे. याचबरोबर जंगलतोडही सुरू असून या दोघा माफियांवर कारवाई करावी, अशी मागणी कर्नाटक राज्य रयत संघातर्फे जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
खानापूर तालुक्मयामध्ये तहसीलदारांच्या आशीर्वादानेच वाळूउपसा करून त्याची तस्करी केली जात आहे. वाळूमाफिया सक्रिय झाले असून त्यामुळे पर्यावरण प्रदूषित होत आहे. तेव्हा तातडीने वाळूमाफियांवर कारवाई करावी. काही ठिकाणी साठे पकडले गेले मात्र तरीदेखील संबंधितांवर कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे वाळूमाफिया राजरोसपणे बेकायदेशीररीत्या वाळूची विक्री करीत आहेत.
याचबरोबर जंगलतोडही मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. बेकायदेशीररीत्या जंगलतोड करून लाकूडविक्रीचे प्रकार पहिल्यापासून आहेत. मात्र, त्यामध्ये वाढ झाली असून संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. तहसीलदार या सर्वांना पाठीशी घालत आहेत, असा आरोप देखील या निवेदनात करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी गंगाधर दोडमनी, सुधीर संभाजी, मंजुनाथ कलकोटगी, युवराज अष्टेकर, भैरू कांबळे, नागेश दोडमनी, महेश मन्नोळकर, प्रदीप अलकुंटे, राघवेंद्र नाईक यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.