शेतवडीतील थ्री-फेज वीजपुरवठा सुरळीत करण्याची हेस्कॉमच्या अधिकाऱयांकडे मागणी
वार्ताहर / खानापूर
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने खानापूर तहसीलदाराना ता. पं., जि. पं. मतदारसंघ पुनर्रचनेत भौगोलिक सलगता राखावी तसेच हेस्कॉमच्या कार्यकारी अभियंत्यांना एक निवेदन सादर करून शेत वाडीतील थ्री फेज वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी करण्यात
आली.
यावेळी तालुका तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य निवडणूक आयोगाने आगामी जिल्हा पंचायत व तालुका पंचायत मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघ पुनर्रचना अभियान हाती घेतले आहे. सदर मतदारसंघाची पुनर्रचना करताना तालुक्मयात नव्याने एका जिल्हा पंचायतीची भर घालण्यात आली आहे. त्यामुळे आता तालुक्मयात सात जिल्हा पंचायत मतदारसंघ राहणार आहेत. तर 24 ऐवजी 20 तालुका पंचायत मतदार संघाची रचना करण्यात आली आहे. तालुक्मयातील वाढत्या लोकसंख्येच्या मानाने मतदारसंघांची पुनर्रचना करणे हा निवडणूक आयोगाचा निर्णय योग्य आहे. परंतु सदर मतदारसंघाची पुनर्रचना करताना भौगोलिक सलगता तसेच स्थानिकांना विश्वासात घेऊनच मतदारसंघांची पुनर्रचना करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सध्या तालुक्मयात कडक उन्हाचा तडाखा सुरू असून उन्हाळी पिकांना आता पाण्याची सक्त गरज आहे.
परंतु हेस्कॉमकडून सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने शेतकरी अडचणीत येत आहेत. प्रामुख्यांने जंगलमय प्रदेशात येणाऱया अनेक गावांना रात्रीच्यावेळी थ्रीफेज वीजपुरवठा केला जात असल्यामुळे शेतकऱयांना रात्रीच्या शेताकडे जावे लागत आहे.
पण यामुळे जंगली प्राण्यापासून धोका निर्माण झाला आहे. धोका टाळण्यासाठी रात्रीऐवजी दिवसा थ्रीफेज पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदन देताना तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष देवाप्पा गुरव, कार्यकारिणी सदस्य गोपाल पाटील, पांडुरंग सावंत, सचिव गोपाळ देसाई, निरंजन सरदेसाई, सूर्याजी पाटील, धनंजय पाटील, रणजित पाटील, विनायक सावंत, तालुका समितीचे सरचिटणीस, पुंडलिक पाटील, राजू पाटील, निळू पाटील, संभाजी पाटील, भूपाल देसाई, स्वागत पाटील, प्रशांत पाटील, सदानंद तोरगल आदी उपस्थित होते.