तालुक्मयात कोरोनाबाधितांचा वाढता आकडा : ग्रामीण भागात वेळीच उपचारांअभावी मृतांच्या संख्येत वाढ
वार्ताहर / खानापूर
खानापूर तालुका आरोग्य खाते व तालुका प्रशासनाने गेल्या महिन्याभरात कोरोना महामारीला रोखण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू केले आहेत. तालुक्मयातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत लसीकरण मोहीम राबवून गावागावात लोकांना सतर्क राहण्याचे आवाहनही केले. गेल्या 10 दिवसांपासून संपूर्ण कर्नाटकात क्लोजडाऊन नियमावली जाहीर करूनही कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. क्लोजडाऊनच्या नियमावलीत दुपारी बारापर्यंत दैनंदिन व्यवहारासाठी व जीवनोपयोगी साहित्याच्या खरेदीसाठी मुभा दिली आहे. परंतु सकाळच्या सत्रात होणाऱया वाढत्या गर्दीला नेमके जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सकाळी 6 ते दपारु 12 वाजेपर्यंत खानापूर शहर बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. खेडय़ापाडय़ातील लोक बाजारासाठी एकच गर्दी करत आहेत. दुसरीकडे ग्रामीण भागात व शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब बनली आहे.
खानापूर शहरात 25 हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण असल्याची नोंद झाली आहे. नगरपंचायतीने या संदर्भात ठोस पावले उचलून निर्बंध घातले आहेत. घराघरातील सर्वेक्षण मोहीम हाती घेतली आहे. परंतु लोक बिनधास्तपणे बाजारपेठेत गर्दी करत आहेत. ग्रामीण भागातील लोक थोडय़ाफार प्रमाणात सतर्क असले तरी तालुक्याच्या दक्षिण भागातील अनेक गावांमध्ये या संसर्गाचा मोठा शिरकाव झाला आहे. शिवठाण, हलगा, मेरडासह अनेक गावांमध्ये मोठय़ा संख्येने लोक आजारी पडत आहेत. खासगी डॉक्टरही उपचारासाठी जाण्यास घाबरत आहेत. शासकीय रुग्णालयात कोरोना टेस्टसाठी कोणीही जात नाहीत. पण खासगी डॉक्टरांच्या सहकार्याने उपचार घेण्यात धन्यता मानत आहेत.
तालुक्मयामध्ये गेल्या आठ दिवसात जवळपास 12 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. हा आकडा आरोग्य पातळीवरील नोंदीत असला तरी प्रत्यक्षात मात्र हा आकडा फार मोठा आहे. रुग्णालयात गुरुवारी गेल्या 24 तासात 6 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. शुक्रवारीही दोघांचा मृत्यू झाल्याचे कळते. या वाढत्या मृत्यूला व वाढत्या गर्दीला जबाबदार प्रशासन की लोक, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने कडक निर्बंध लादूनही लोकांना सतर्क राहण्याचे भान नाही.
45 वर्षांवरील लोकांना लसीकरण मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन केले. तालुक्मयामध्ये आतापर्यंत जवळपास 38,000 हून अधिक 45 वर्षांवरील लोकांना लसीकरण केले आहे. पण अजूनही बरेच लोक लसीकरणापासून वंचित आहेत.
अनेक गावांचा गाव प्रवेशबंदीचा निर्णय
अनेक गावांनी गाव प्रवेशबंदीचा निर्णय घेतला आहे. अनेक गावे संसर्गाची हॉटस्पॉट बनली आहेत. परंतु लोकांना याचे गांभीर्य राहिले नाही. खानापूर तालुक्मयाच्या दक्षिण भागातील नंदगड व लोंढा जिल्हा पंचायत क्षेत्रातील अनेक गावांत लोक आजाराने त्रस्त आहेत. त्यामुळे अनेकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येकाने सतर्क राहण्याची वेळ आली आहे. आगामी 15 दिवस हे फार धोक्मयाचे असून कोरोना संसर्गाचा वाढता काळ या दिवसात असल्याचे तज्ञांचे मत आहे.
चाकरमान्यांनी अधिक काळजी घेणे गरजेचे
चाकरमानी आपली व आपल्या कुटुंबाची योग्य काळजी न घेता बिनधास्तपणे फिरत असल्याने त्याचा धोका गावांवर होत आहे. परप्रांतामध्ये कोरोनाची वाढती लक्षणे आहेत. पण तिथून आलेले चाकरमानी खानापूर तालुक्मयाच्या बऱयाच गावांमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्यामुळे संसर्गात वाढ होत असल्याचेही दिसून आले आहे. यासाठी एखादा चाकरमानी स्वतःच्या गावाकडे वळत असल्यास त्याने किमान सात दिवस होमक्वारंटाईन व्हावे, असे आवाहन केले जात आहे.
तहसीलदारांचे आवाहन
कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. प्रत्येकांनी मास्क व सामाजिक अंतर राखणे, अशी विनंती तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांनी केली आहे. महसूल विभागाची आपत्कालीन सेवा 24 तास सुरू असून अधिक माहितीसाठी 222225 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहनही त्यांनी केले.
निष्काळजीपणा जीवावर बेतेल, सतर्कता राखा – आमदार डॉ. अंजली निंबाळकर
तालुक्मयात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे. प्रशासनातर्फे गांभीर्याने यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी जनतेचे सहकार्य फार महत्त्वाचे आहे. खानापूर शासकीय रुग्णालयात 23 बेडची व्यवस्था व नंदगड येथे 12 बेडची व्यवस्था आहे. पण अतिगंभीर आजारासाठी आयसोलेशन वॉर्ड नसल्याने समस्या निर्माण होऊ शकते. यासाठी कमी आजारपणात अचूक उपचार घेऊन आपले आरोग्य सांभाळावे. रुग्णांच्या सेवेसाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत 24 तास सेवा पुरविली जात आहे.