प्रतिनिधी/ बेळगाव :
शहरातील रेल्वे स्टेशन स्मार्ट बनविण्यासाठी विविध विकास कामे राबविण्यात येत आहेत. मात्र या परिसरातील रस्त्यांच्या विकासाकडे प्रशासनाने कानाडोळा केला आहे. मागील वषी करण्यात आलेल्या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे निर्माण झाले असून, मुख्य पोस्ट कार्यालय ते रेल्वे स्टेशनपर्यंतच्या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असून, वाहनधारकांना ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळे रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
स्टेशनरोड म्हणुन ओळखल्या जाणाऱया रस्त्याच्या विकासाकडे मागील दोन वर्षापासून दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे या रस्त्यावर निर्माण झालेल्या लहान खड्डय़ांना मोठे स्वरूप प्राप्त झाले आहे. उन्हाळय़ात या खडय़ांचे गांभिर्य जाणवले नाही. मात्र पावसाचे पाणी साचत असल्याने याचा फटका वाहनधारक आणि पादचाऱयांना बसत आहे. मागील वषी पावसाळय़ात या रस्त्यावर दीड फूट पाणी साचले होते. त्यामुळे रस्त्याची दैना अवस्था झाली होती. रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. पण कॅन्टोन्मेंट बोर्डने रस्त्याच्या विकासाकडे दुर्लक्ष केले आहे. रेल्वे स्टेशन आणि रेल्वे बसस्थानकावर येणाऱया नागरीकांना शहरात येण्यासाठी स्टेशनरोड सोयीचा आहे. त्यामुळे या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. रेल्वेने येणारे प्रवासी बाजारपेठेत किंवा शहरात येण्यासाठी या रस्त्याचा अवलंब करतात. पण सध्या या रस्त्याची स्थिती बिकट बनली आहे. मागील वषी पावसाळय़ानंतर रस्त्याची तात्पुरती दुरूस्ती करण्यात आली. पण आता या रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ वाढल्याने पुन्हा खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. खानापूर रोडच्या काँक्रिटीकरणासाठी रस्त्यावरील वाहतुक वळविण्यात आल्याने वाहनधारक स्टेशन रस्त्याने ये-जा करीत होते. वास्तविक पाहता वाहतूक वळविण्यापूर्वी रस्त्याची दुरूस्ती करणे गरजेचे होते. पण याबाबत स्मार्ट सिटी कंपनी आणि कॅन्टोन्मेंट बोर्डने कोणतीच दखल घेतली नसल्याने संपूर्ण रस्ता खराब झाला आहे. रेल्वे स्टेशन नजिकच नव्याने करण्यात आलेल्या रस्त्यावर मोठे खड्डे निर्माण झाले आहे. तसेच रेल्वेभवन आणि विश्रामगृहसमोर खड्डयांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ये-जा करताना वाहनधारक खड्डे चुकविण्याचा प्रयत्न करीत असल्याने अपघात घडत आहेत. खड्डा चुकविणे देखील मुष्कील बनले आहे. पण रस्ता इतका खराब झाला असून हा रस्ता जीवनघेणा बनला आहे. अशातच येथील पथदीप देखील कायमस्वरूपी बंद पडले आहेत. पथदीपांची दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी कॅन्टोन्मेंट बोर्ड व रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली होती. पण याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे अंधारातच खड्डेमय रस्त्यावरून नागरीकांना ये-जा करावी लागत आहे. रात्रीच्यावेळी रेल्वेने येणाऱया नागरीकांना अंधारामधूनच जावे लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरूस्ती करण्यासाठी पथदीप सुरू करावेत अशी मागणी होत आहे.