प्रतिनिधी/ खानापूर
खानापूर येथील वकील संघटनेतर्फे कोरोना लसीचे जागृतीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबीरामध्ये 45 वर्षावरील सर्व वकीलांनी कोरोना लसीकरण करुन घेण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. त्यानुसार येथील आरोग्य केंद्रामध्ये वकीलवर्गानं व कर्मचाऱयांनी कोरोना लस घेतली. यावेळी वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड. ईश्वर घाडी म्हणाले, सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा आग ओकू लागल्याने समाजातील प्रत्येक नागरिकांनी आपली सुरक्षितता ओळखून मास्क व सामाजीक अंतर राखावे. शिवाय सरकारला सहाय्य करत प्रत्येकाने कोरोना लस टोचून घेऊन जबाबदार नागरिक होण्याचा हक्क बजावावा असे मत मांडले.
यावेळी तालुका आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे, उपाध्यक्ष ऍड केशव कळळेकर, ऍड. जी. एम. देसाई, ऍड. सी. जी. पाटील, ऍड. ए. एम. देसाई, ऍड. बी. आय. पाटील, ऍड. एस. आय. पाटील, ऍड. सुरेश भोसले, ऍड. पी. एन. बाळेकुंद्री आदी उपस्थित होते.