खानापूर / प्रतिनिधी
खानापूर शहरामध्ये ऑगस्ट-2019 मध्ये आलेल्या महापुरानंतर गेले 15 महिने एक दिवसाआड नळपाणीपुरवठा योजना सुरू आहे. यासंदर्भात नगरपंचायतीला जाब विचारण्यासाठी भाजपचे युवा नेते पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली महिला, युवक व नागरिकांनी गुरुवारी नगरपंचायत कार्यालयात जाऊन मुख्याधिकारी विवेक बन्ने यांची भेट घेतली व त्यांना एक निवेदन सादर केले.
मलप्रभा नदीमध्ये भरपूर पाणी असतानाही एक दिवसाआड पाणी पुरविण्याचे कारण काय? तसेच या पुढे दररोज पाणीपुरवठा झालाच पाहिजे. शिवाय गेल्या 15 महिन्यांतील पाणीपट्टीमध्ये 50 टक्के कपात करावी, अशी मागणी केली.
यावर मुख्याधिकाऱयांनी यापूर्वी 50 अश्वशक्तीच्या दोन विद्युत मोटारीद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. पण त्यापैकी एक 50 अश्वशक्तीची विद्युत मोटर पूर्णत: खराब झाली आहे. यामुळे केवळ एकच मोटरवर भार पडत असल्याने एक दिवसाआड पाणी दिले जात आहे. नवीन विद्युत मोटर मंजूरही झाली आहे. त्याची निविदा मंजूर झालेल्या कंपनीने दिलेल्या वेळेत ती पोचवली नाही. यामुळे त्या कंपनीची निविदा रद्द करून त्यांची अनामत रक्कमही जप्त केली आहे. आता नवीन निविदा प्रक्रियेला विलंब लागत असल्याने सध्या नगरपंचायतीकडे असलेली जुनी मोटर तातडीने दुरुस्त करून येत्या पंधरा ते वीस दिवसांत दररोज पाणीपुरवठा केला जाईल, असे आश्वासन दिले. तसेच गेल्या 15 महिन्यांच्या पाणीपट्टीत कपात करण्यासाठी वरि÷ांकडे प्रस्ताव पाठवून देऊ, अशी ग्वाही दिली. दिलेल्या आश्वासनाप्रमाणे दररोज पाणीपुरवठा शक्मय तेवढय़ा लवकर सुरू करावा, अन्यथा आम्हाला पुनः एकदा नगरपंचायतीवर मोर्चा काढावा लागेल, असा इशारा पंडित ओगले यांनी दिला.
तसेच मुरगोड प्लॉटमधील मोकळय़ा जागेत पथदीप नसल्याने त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेला अंधार पडतो. मोकळी जागा असल्याने त्या ठिकाणी मुले खेळत असतात. यामुळे त्या ठिकाणी तातडीने पथदिपाची सोय करावी, अशी मागणीही ओगले यांनी केली. त्यावेळी मुख्याधिकारी बन्ने यांनी आता तातडीने जागेची पाहणी करून पथदीपही लवकरात लवकर बसवून देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी पंडित ओगले यांच्या समवेत भाजप जनरल सेपेटरी गुंडू तोपिनकट्टी, भाजपा अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष जॉर्डन गोन्साल्विस, सोशल मीडिया प्रमुख राजेंद्र रायका, बाळासाहेब सावंत, लोंढा भाजपा प्रकाश निलजकर, राजू गावडे, अनंत सडेकर, किरण तुडयेकर, लोकेश कलबुर्गी, भाजप महिला आरती ओगले, गीता देसाई, मंगला शापूरकर, वैशाली हवले, वनिता कवलेकर, गीता देसाई तसेच इतर भाजप युवा व महिला वर्ग उपस्थित होते.