जिल्हाधिकाऱयांकडे मागणी करणार : मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्राr यांची माहिती
प्रतिनिधी / कणकवली:
नुकतेच शिवसेना आमदार, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, त्यांचे कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह होऊन बरे झालेले आहेत. असे असताना काही दिवसांपूर्वीच मुंबईतून आलेल्या व चाकरमान्यांना गणपतीला गावी न येण्याचा सल्ला देणाऱया खासदारांनी स्वत: होम क्वारंटाईन होण्याची गरज आहे. कारण ते सोबत जिल्हय़ातील पदाधिकाऱयांना घेऊन फिरतात, सर्वांना भेटतात. कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी त्यांना होमक्वारंटाईन करण्याची मागणी मनसेतर्फे जिल्हाधिकाऱयांकडे करण्यात येणार असल्याचे मनसेचे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्राr यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
शासन व आयसीएमआरचे क्वारंटाईन होण्याचे नियम राजकीय पुढाऱयांना लागू होत नाहीत का? त्यांना लागू होत नसतील, तर मुंबईहून येणाऱया चाकरमान्यांना का लागू करावेत? ज्यांनी यांना निवडून दिले, त्यांना एक व सर्वसामान्यांना एक नियम हा कोणता दुजाभाव? कणकवली शहरात गेली तीन वर्षे रस्त्याला खड्डे, रस्ता खचणे, पाणी तुंबणे अशा घटना घडत आहेत. खासदार भेट देत फोटो काढतात व काम बंदचे आदेश देतात. मात्र, खासदार, आमदारांना ठेकेदार, अधिकारी जुमानत नाहीत हे येथील जनतेला कळून चुकले आहे. कणकवलीत 13 जुलै रोजी बॉक्सेल ब्रिज कोसळल्यानंतर पालकमंत्र्यांनी आठ दिवसांत स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. मात्र, यासाठी नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. म्हणजेच त्यांच्या खात्याचे लोकही त्यांचे ऐकत नाहीत. या साऱया परिस्थितीचा विचार करता, मनसेशिवाय आता कोकणला पर्याय राहिलेला नसल्याचे मेस्त्राr यांनी या पत्रकात म्हटले आहे.