आचरा /प्रतिनिधी-
समुद्र आणि खाडीच्या अतिक्रमणापासून आवश्यक सुरक्षेच्या उपाययोजनेसाठी दोन दिवस केलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी खा विनायक राऊत यांनी तळाशिलला भेट देऊन तळाशिल वासियांच्या सुरक्षेसाठी ६५मिटरचा एक टप्पा बंधारा देण्याची ग्वाही दिली. कालावल खाडीतील तळाशिल रेवंडी समोरील भागातील वाळू उपसा निविदा लावू नयेच्या सुचना फोनवरून निवासी जिल्हाधिकारी करत याबाबत गुरुवारी खासदारांनी ग्रामस्थांसमवेत जिल्ह्याधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केल्याची माहिती तळाशिल ग्रामविकास मंडळाचे संजय केळूस्कर यांनी दिली आहे.
यावेळी त्यांच्या सोबत आमदार वैभव नाईक, बबन शिंदे, जान्हवी सावंत, तालुकाध्यक्ष हरी खोबरेकर, तोंडवळी सरपंच आबा कांदळकर, तळाशिल ग्रामविकास मंडळाचे जयहरी कोचरेकर, संजय केळूस्कर, ताता टिकम,तारी, आनंद खडपकर,संजय जुवाटकर,पाडूरंग शेलटकर,विवेक रेवंडकर,प्रकाश बापर्डेकर, मुन्ना तांडेल यांसह अन्य ग्रामस्थ आदी उपस्थित होते.