आठवडी बाजारचा कायापालटसाठी झाडांची कत्तल : स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांचा वेगळा प्रयोग
प्रतिनिधी / बेळगाव
शहरात मोठी बाजारपेठ आहे. मात्र, उपनगरी भागात आठवडी बाजार भरतो. खासबाग येथील बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात उलाढाल होत असते. येथील परिसराचा विकास करण्यासाठी झाडांची कत्तल करण्यात आली असून या ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी व्यापारी गाळे उभारण्यात येत आहेत. त्यामुळे उन्हाच्या चटक्मयात व्यवसाय करण्याची वेळ व्यापाऱयांवर आली आहे.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहराचा विकास करण्यात येत आहे. शहर स्मार्ट बनविण्यासाठी प्रत्येक परिसरात झाडांची कत्तल मोठय़ा प्रमाणात करण्यात येत आहे. विविध भागातील झाडे यापूर्वी हटविण्यात आली होती. मात्र, खासबाग आठवडी बाजारचा कायापालट करण्यासाठी येथील झाडांची कत्तल केली आहे. बॅ. नाथ पै चौक ते खासबाग बसवेश्वर चौकपर्यंतच्या रस्त्याच्या मध्यभागी असलेली सर्व झाडे तोडण्यात आली आहेत. या ठिकाणी मोठमोठी झाडे होती. त्यामुळे आठवडी बाजारात येणाऱया व्यावसायिकांना आणि ग्राहकांना सावलीचा आधार मिळत होता. पण या परिसराच्या विकासाच्या नावावर संपूर्ण झाडे हटविण्यात आली आहेत. या ठिकाणी व्यापारी गाळे उभारण्यात येत आहेत. एरवी रस्त्याशेजारी गाळे उभारण्यात येतात. मात्र या ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी गाळय़ांची उभारणी करून स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांनी वेगळा प्रयोग चालविला आहे. पण हा प्रयोग यशस्वी होईल का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
दर रविवारी खासबाग येथील आठवडी बाजार भरतो. मोठय़ा प्रमाणात व्यावसायिक व ग्राहकांची गर्दी असते. उन्हाळय़ात झाडांच्या सावलीचा आधार घेत व्यावसायिक व्यवसाय करतात. मात्र, सध्या ही झाडे पूर्णपणे हटविण्यात आल्याने व्यावसायिकांची गैरसोय होणार आहे. सावलीऐवजी आता ऊन-पावसात बसून व्यवसाय करावा लागणार आहे. या ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी गाळे उभारण्यात येत आहेत. पण रविवारव्यतिरिक्त या रस्त्यावर वाहनांची वर्दळ मोठय़ा प्रमाणात असते. गाळय़ांमध्ये व्यवसाय सुरू केल्यास रस्त्यावरून नागरिक आणि लहान मुलांची ये-जा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनांचा धोका नागरिकांना होण्याची शक्मयता आहे. हा प्रयोग कितपत यशस्वी होणार, अशी विचारणा नागरिक करीत आहेत.