नगरसेवक रवि साळुंखे यांच्या पाठपुराव्यानंतर दुरुस्ती
प्रतिनिधी /बेळगाव
एलऍण्डटी कंपनीच्यावतीने जलवाहिन्या घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. खासबाग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जलवाहिन्या घालताना जुन्या वाहिनीचे नुकसान झाल्याने गळती लागली होती. परिणामी नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागले.त्यामुळे नगरसेवक रवि साळुंखे यांनी एलऍण्डटी कंपनीच्या अधिकाऱयांकडे पाठपुरावा करून जलवाहिनीचे निवारण केले.
शहरात 24 तास पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जलवाहिन्या घालण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. याअंतर्गत शहापुरसह विविध परिसरात जलवाहिन्या घालण्यात येत आहेत. सदर जलवाहिन्या घालताना सध्या पाणी पुरवठा करण्यात येणाऱया जलवाहिनीचे नुकसान झाले. सदर ठिकाणी खड्डा खोदून ठेवण्यात आला, मात्र दुरूस्ती करण्यात आली नाही.
त्यामुळे परिसरातील पाणी पुरवठा ठप्प झाला होता. त्यामुळे सदर जलवाहिनीच्या दुरूस्तीसाठी नगरसेवक रवि साळुंखे यांनी एलऍण्डटी कंपनीच्या अधिकाऱयांकडे पाठपुरावा कुरून दुरूस्तीचे काम पूर्ण करून घेतले.