रत्नागिरी/प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यात गुरुवारपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. अशातचं खेड तालुक्यातील मौजे पोसरे धामणन बौद्धवाडी येथे घरांवर दरड कोसळल्याने सात कुटुंबातील १७ जण या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या ढिगाऱ्याखाली २४ जनावरे देखील अडकली असल्याची माहिती आहे.
धामणंद बौद्धवाडी येथे अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये सात कुटुंबातील १७ जण ढिगाऱ्याखाली सापडले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या ढिगाऱ्याखाली २४ जनावरे देखील अडकली असल्याची माहिती आहे. तसेच या घाणेमुळे दहा जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती विभागाने दिली आहे.
तसेच चिपळूण तालुक्यातील कुभाली येथेही घाटात दरड कोसळली होती. तेथील दरड हटवण्यात आली आहे. कोल्हापूर रत्नागिरी मार्गांवर आंबा घाटात रस्ता खचल्याने वाहतूक बंद केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गुरुवारी दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणची वाहतूक बंद पडली आहे. अनेक ठिकाणी पूल वाहून गेले आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.