वार्ताहर / यड्राव
हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी येथे परप्रांतीय कामगारांनी आपल्या मूळ गावी जाण्याच्या मागणीसाठी आज पुन्हा बेकायदेशीर जमवा जमव करत रास्ता रोको केला. अधिकाऱ्यांच्या समजावून सांगीतल्यानंतरही परप्रांतीय कामगारांचे समाधान झाले नाही. उलट अधिकच संताप व्यक्त करीत प्रचंड उद्रेक केला व काही समजण्या आधी पाचशेवर कामगारांनी हातात सापडेल ते साहित्य भिरकावण्यास सुरुवात केली. या दगडफेकीत एक ग्रामपंचायत कर्मचारी व एक महिला पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. तर प्रसंगावधान राखत जमावातून सरपंच संजय चोपडे सुखरूप बचावले. कामगारांचा उद्रेक पाहून पोलिसांनी उपस्थितांना पांगवले यावेळी शहापूर गाव भाग शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कर्मचारी जमा व नियंत्रण पथक व उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश बिराजदार यांच्यासह मोठा फौजफाटा तात्काळ दाखल झाला होता. त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात बेकायदेशीर जमाव करून चिथावणी खोर कृत्य केल्याबद्दल सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आज सकाळी पहाटे पाच पासून बिहार राज्यातील कामगारांनी खोतवाडी ग्रामपंचायतीसमोर आपल्या मूळ गावी जाण्यासाठी गर्दी केली होती. याची माहिती मिळताच सरपंच संजय चोपडे यांनी घटनास्थळी येऊन जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने पोलिस व महसूल कर्मचाऱ्यांना बोलवून घेतले. यावेळी तलाठी अनंत दांडेकर यांनी सध्या तात्काळ मूळ गावी जाण्याची व्यवस्था होणार नाही, दोन दिवसानंतर प्रयत्न करतो. असे आश्वासन दिल्या नंतर वारंवार गावी सोडण्याची मागणी करूनही प्रशासकीय अधिकारी केवळ आश्वासने देत आहेत. यामुळे वैतागलेल्या कामगारांत या घटनेचा संताप व्यक्त होऊन प्रचंड उद्रेक झाला त्यांनी महाराष्ट्र शासन व ग्रामपंचायत पदाधिकारी यांना शिव्यांची लाखोली वाहिली व त्यानंतर कामगारांनी आपल्या हातात सापडेल ते साहित्य दगड नारळ काठी आधी घेऊन ग्रामपंचायत सरपंच पदाधिकारी कर्मचारी व पोलिसावर भिरकावून यास सुरुवात केली.
अचानक कामगारांचा असा रुद्रावतार पाहून पोलीसही गोंधळून गेले, त्यामुळे पोलिसांनी जमावावर नियंत्रण करण्यासाठी जमाव नियंत्रण पथक गावभाग शिवाजीनगर कडून अधिकाऱ्यांचा फौजफाटा मागवण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार शिवाजी नगरचे ईश्वर ओमासे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लाटी उगारून जमावाला पांगवले. दरम्यान पोलिस उपअधीक्षक गणेश बिरादार हेही घटनास्थळी येऊन त्यांनी उद्रेकवर नियंत्रण मिळविले. बेकायदेशीर जमाव करून चिथावणी देऊन उद्रेक करणार्या परप्रांतीय सात कामगारांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या. यामध्ये संजय कुमार, श्री नागेंद्र राऊत राहणार गया, राजकुमार श्रीचन्द्र सहा राहणार हा पूरक आला मनोहर कुमार मोहन सहा रमेश कुमार लालबाबू राम यादव कुमार राम संजीवन महणतो संतोष कुमार सहा ,मुकेश कुमार हरिचंद्र राम प्रसाद चौघे राहणार रतनपुर सर्व बिहार राज्य सध्या राहणार अरुण मास्तर यांचे चाळीत पार्वती औद्योगिक वसाहती समोर खोतवाडी यांचा यामध्ये समावेश आहे यामुळे खोतवाडी परप्रांतीय कामगार विरोधात संतापाची लाट उसळली आहे.
ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी परप्रांतीय कामगारांची उपासमार होऊ नये म्हणून दोन दिवसांपासून जेवणाची व्यवस्था केली आहे. त्यांना सकाळ संध्याकाळ जेवण दिले जाते. आज सकाळी ही मोठ्या संख्येने कामगार जमल्याने पोहे व चहा याचेही नियोजन करण्यात आले होते. मात्र लोक दौंडमध्ये माणुसकी जपत कामगारांची काळजी करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर शिवी गाळीची लाखोली वाहत दगडफेक करून उपकाराची परतफेड केल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे